शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

शेततळे घाेटाळ्यातील आराेपींना सात वर्षांनंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 17:33 IST

Crime Scam : २५ लाखांचा अपहार, विर्दभातील आठ जिल्ह्यांतील आराेपींचा सहभाग

ठळक मुद्देनरेंद्र गणवीर रा. धामगाव जि. अमरावती, विश्वंभर तायडे रा. मलकापूर जि. बुलडाणा यांना अटक करण्यासाठी शहर पाेलिसांचे पथक गेले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात मित्रा संस्थेकडून शासन अनुदानावर शेततळे खाेदण्याचे काम घेण्यात आले हाेते. यासाठी संस्थेला २४ लाख ९८ हजाराचा निधी २०१३ मध्ये देण्यात आला. मात्र, संस्थेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी केवळ कागदाेपत्रीच शेततळे दाखवून निधी हडपला. या प्रकरणी मित्रा संस्थेचे विभागीय प्रमुख ओमदेवसिंग चुडासमा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानंतर याचा काेणीच तपास केला नाही. सात तपास अधिकारी बदलूनही गुन्हा प्रलंबित हाेता. आता आराेपींना अटक झाली आहे. राजू वामनराव इंगळे (४२) रा. नागपूर, विकास प्रभाकर डांगे (३६) रा. विडूळ जि. यवतमाळ, दिनेश बापूराव वांढरे (४१) रा. नागपूर, विजय माेतीराम बरडे (३७) रा. भंडारा, अभय भीमराव तायडे रा. अडाेळी जि. वाशिम, रेवदास पंचभाई रा. चंद्रपूर, ओमप्रकाश पाथाेडे रा. आमगाव जि. गाेंदिया असे अटक झालेल्या आराेपींची नावे आहेत. नरेंद्र गणवीर रा. धामगाव जि. अमरावती, विश्वंभर तायडे रा. मलकापूर जि. बुलडाणा यांना अटक करण्यासाठी शहर पाेलिसांचे पथक गेले आहे.

आराेपींनी मित्रा संस्थेच्या माध्यमातून शेततळे खाेदण्याचे काम घेतले. त्यांना २८३ शेततळे खाेदण्याचे काम दिले गेले हाेते. यापैकी काहीच शेततळे पूर्ण केले. उर्वरित शेततळे कागदाेपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखवून बिले काढली. हा प्रकार पुणे येथील पथकाच्या पाहणीतून निष्पन्न झाला. त्यानंतर या प्रकरणात ९ आराेपींविराेधात कलम ४१७, ४१८, ४२०, ४६८, ४७१, ४६५, २०१, १२० ब, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. २०१३ मध्ये दाखल गुन्ह्यात पाेलिसांनी काेणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे नऊ आराेपी बिनधास्तपणे फिरत हाेते. हा गुन्हा प्रलंबित असल्यासने त्याचा तपास पूर्ण करण्याचे निर्देश पाेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. त्यावरून शहर ठाणेदार धनंजय सायरे यांनी पथकाचे गठन करून आठ जिल्ह्यात दडून असलेल्या आराेपींना शिताफीने अटक केली. यातील एका आराेपीची कारागृहात रवानगी झाली आहे. उर्वरित सहा आराेपींना पाेलीस काेठडीत ठेवण्यात आले आहे. इतर दाेन आराेपींना लवकरच अटक केली जाईल असे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सांगितले.बाॅक्स्

सात तपास अधिकारी बदलले२०१३ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चक्क सात अधिकारी बदलले. त्यानंतरही कारवाई झाली नाही. हा गुन्हा प्रलंबितच हाेता. अखेर आठव्या क्रमांकाच्या तपास अधिकारी ठरलेल्या ठाणेदार धनंजय सायरे यांनी आराेपींना अटक करून गुन्ह्याच्या तपासाला गती दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयYavatmalयवतमाळPoliceपोलिस