शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एका रसगुल्ल्यामुळे लग्न मंडपात पसरली शोककळा; नवरीचं कुटुंब फरार, १२ जखमी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 17:32 IST

खुर्ची, चाकू, ताट, चमचा, काटा, हातात जे काही मिळेल त्याला शस्त्र बनवलं. या हाणामारीत २० वर्षीय सनीचा चाकू लागल्याने मृत्यू झाला.

आग्रा येथे एका रसगुल्ल्यामुळे लग्नाच्या आनंदात दु:खाचं विरजन पडलं आहे. लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या २० वर्षीय मुलाचा चाकू लागल्याने मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर वऱ्हाड  लग्नाशिवाय माघारी परतलं. बुधवारी ही घटना घडली. खंडौली येथे राहणारे व्यापारी वकार यांची दोन मुले जावेद आणि रशीद यांचा विवाह एतमादपूर येथे राहणार्‍या उस्मानच्या मुली जैनब आणि साजिया यांच्याशी होणार होता. 

वऱ्हाडी मंडळींना जेवण दिले जात होते. एका पाहुण्याने रसगुल्ला आवडल्यामुळे आणखी एक खाण्यासाठी मागितला. त्यावर काउंटरवर उभ्या असलेल्या तरुणाने प्रत्येकाला एक-एक मिळेल असं सांगितल्याने वाद झाला. या वादाचे रुपांतर रक्तरंजित चकमकीत झाले. दोन्ही बाजूची मंडळी एकमेकांना भिडली. खुर्ची, चाकू, ताट, चमचा, काटा, हातात जे काही मिळेल त्याला शस्त्र बनवलं. या हाणामारीत २० वर्षीय सनीचा चाकू लागल्याने मृत्यू झाला.

अर्ध वऱ्हाड जेवून परत निघालेमृत युवक सनीचा काका इम्रान यांनी सांगितले की, आम्ही वेळेवर वऱ्हाड घेऊन विनायक भवनला पोहोचलो होतो. वऱ्हाड येताच जेवणाच्या पंगती बसल्या. दीड तासात जेवण करून अर्ध वऱ्हाड परत निघालं होतं. प्रत्येकाला घरी जायचे होते. लग्नासाठी वराचे काही खास नातेवाईक आणि मित्रच राहिले होते.सनीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलया घटनेमुळे नववधूंच्या घरी शोककळा पसरली असून, मृत सनीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मृत सनीचे काकाने महिलांचा छळ आणि दागिने लुटण्यात आल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी एसपी सत्यजीत गुप्ता म्हणाले की, या घटनेत शाहरुख, निजाम, शकील, जानू, रहमान रमिया यांच्यासह १२ जणांपेक्षा अधिक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटना झाल्यापासून नवरीकडचं संपूर्ण कुटुंब फरार झालं आहे.