शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आईसह तिच्या ४ मुलांच्या हत्येप्रकरणी २८ वर्षानंतर पहिला आरोपी अटकेत 

By धीरज परब | Updated: December 30, 2022 15:01 IST

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पेणकरपाडा भागातल्या भारवाड चाळ मध्ये १६ नोव्हेम्बर १९९४ रोजी हे हत्याकांड घडले होते.

धीरज परब 

मीरारोड - १९९४ साली मीरारोडच्या पेणकरपाडा भागात तीन तरुणांनी क्षुल्लक वादातून शेजारी राहणाऱ्या महिलेसह तिच्या ४ चिमुरड्यांची चॉपर व चाकूने वार करून निर्घृण हत्या केली होती. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भयावह अशा ५ जणांच्या हत्याकांडातील एका आरोपीस तब्बल २८ वर्षांनी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत असून अटक आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेणकरपाडा मधील भारवाड चाळीत राजनारायण शिवचरण प्रजापती ( त्यावेळचे वय २९ वर्ष ) हे पत्नी जगराणीदेवी (२७ ), ५ वर्षांचा मुलगा प्रमोद, साडेतीन वर्षांची मुलगी पिंकी, २ वर्षांचा मुलगा चिंटू आणि ३ महिन्याचा मुलगा असे रहात होते . राजनारायण हे नजीकच्या किराणा दुकानात काम करायचे. ते मूळचे उत्तर प्रदेशच्या इलाहाबादमधील होते. त्याच चाळीत प्रजापती यांच्या समोरच्या खोलीत साहबलाल अमरनाथ चौहान ऊर्फ काल्या ऊर्फ साहेब ऊर्फ राजकुमार ( त्यावेळी वय १९ वर्ष ) हा  सुनिल रामअवैध ऊर्फ सरोज आणि अनिल रामअवैध ऊर्फ अवधु सरोज हे दोघे भाऊ असे तिघेजण राहायचे. 

जगराणीदेवी हिच्याशी बळजबरी करण्यासाठी अनिलच्या मोठ्या भावाने तिचा हात धरला होता. त्यावरून त्याने भांडण झाले होते. तर जगराणीदेवी हिचे लहान मुलं आरोपींच्या आरोपींच्या घरात जाऊन खेळायची त्यावेळी त्यांची सुटकेस तुटली होती. त्यावरून भांडण होऊन प्रजापती यांनी त्यांना नवीन सुटकेस आणून दिली होती. मात्र भांडणाचा राग ५ जणांच्या हत्येस कारणीभूत ठरेल असे कोणाला वाटले नव्हते. 

१६ नोव्हेंबर १९९४ रोजी दुपारी पावणेचार ते रात्री ११ दरम्यान राजकुमार, सुनिल व अनिल यांनी प्रजापती यांच्या घरात घुसून जगराणीदेवी सह तिच्या चारही चिमूरड्यांची चॉपर व चाकूने वार करून निर्दयीपणे हत्या केली होती. ५ जणांची हत्या केल्यानंतर त्यांच्या घराला बाहेरून टाळे मारले. हत्येसाठी वापरलेली हत्यारे व रक्ताने माखलेले कपडे त्यांनी स्वतःच्या खोलीत लपवून ठेवत ते पळून गेले होते. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात ह्या हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला होता. मात्र आरोपींच्या मिळालेल्या उत्तर प्रदेश मधील पत्त्यांवर ते सापडले नव्हते.  

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय झाल्यावर २०२० साली तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते व गुन्हेशाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी शहरातील सर्वात मोठ्या व भयाण अश्या ह्या हत्याकांडाचा गुन्हा इतकी वर्ष होऊन सुद्धा उघडकीस न आल्याने त्याचा तपास प्राधान्याने करण्याचे निर्देश गुन्हे शाखा १ ला दिले . डॉ . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या पथकाने कसोशीने तपास सुरु केला.  

पोलीस पथक आरोपींच्या शोधासाठी उत्तर प्रदेश मध्ये गेले. पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा यांना आरोपी राजकुमार चौहान बद्दल महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर जून २०२१ मध्ये गुन्हे शाखेचे पथक २० दिवस वाराणसी येथे तळ ठोकून होते . उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफचे उपअधिक्षक शैलेश प्रताप सिंह, निरीक्षक अमित श्रीवास्तव, उपनिरीक्षक अंगदसिंह यादव सह पोलीस कर्मचारी अदविंद सिंह, सत्यपाल सिंह तसेच पोलीस मित्र राहुल राठोड यांनी आरोपीच्या शोधासाठी चांगले सहकार्य केले. 

तपासात राजकुमार ऊर्फ काल्या हा उत्तर प्रदेशच्या बनारसचा असून कामानिमीत्त २००७ पासून आखाती देशातील कतार येथे असतो व दोन तिन महिन्याकरीता मुळ गावी परत येत असतो अशी माहिती मिळाली. २०२० मध्ये तो वोस्ट्रो अकाउंट ऑफ दोहा अँड कतार या कंपनीत आहे व लवकरच मुळ गावी येणार आहे अशी माहीती पोलिसांना मिळाली.  त्याचा पासपोर्ट क्रमांक पोलिसांना सापडला. २०२१ मध्येच त्याच्या नावाने लुकआऊट नोटीस बजावण्यात आली होती.  

गुरुवार २९ डिसेंबर २०२२ रोजी राजकुमार चौहान हा कतारवरून गावी उत्तर प्रदेशला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर उतरला असता विमान प्राधिकरणाने लुकआऊट नोटीस असल्याने त्याला ताब्यात घेतले व त्याची माहिती काशीमीरा पोलिसांना देण्यात आली . पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. शुक्रवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ४ जानेवारी २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सुनील व अनिल सरोज ह्या दोन फरार आरोपी भावांचा पोलीस शोध घेत आहेत. 

गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे, उपनिरीक्षक  हितेंद्र विचारे सह संदीप शिंदे,  किशोर वाडीले, संजय पाटील, राजु तांबे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, सचिन सावंत, समीर यादव, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी यांच्या पथकाने तब्बल २८ वर्ष उघडकीस न आलेला ह्या ५ जणांच्या हत्याकांडाच्या गुन्ह्यातील पहिल्या आरोपीस अटक करण्यात यश मिळवल्या बद्दल पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पथकाचे कौतुक केले आहे . 

राजनारायण प्रजापती यांना जिवंतपणी मिळाला नाही  न्याय 

आपल्या पत्नी व ४ मुलांची हत्या करणाऱ्या त्या तीन आरोपीना पोलिसांनी पकडावे व त्यांना शिक्षा व्हावी अशा प्रतिक्षेत फिर्यादी राजनारायण प्रजापती हे तब्बल २८ होते . मात्र काही महिन्यां पूर्वीच त्यांचे अपघाती निधन झाले . जिवंतपणी त्यांना न्याय मिळू शकला नाही मात्र आता एक आरोपी पोलिसांच्या अटकेत आला आहे. तर अन्य दोघे आरोपी सुद्धा लवकरच सापडतील अशी आशा व्यक्त होत आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी