शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या विवाहित प्रेयसीचा काटा काढला; सिक्युरिटी गार्डला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 12:36 IST

पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले. तेव्हा खाकीचा धाक दाखवताच आरोपीने सर्व गुन्हा कबूल केला. 

 मुंबई - दिल्लीतील निक्की यादव हत्याकांड चर्चेत असताना नवी मुंबईत एका सिक्युरिटी गार्डने विवाहित महिलेची हत्या केली आहे. आरोपीचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राजकुमार बाबूराम पाल याला अटक केली आहे. ही महिला सातत्याने लग्नासाठी दबाव टाकत असल्याने तिचा काटा काढल्याचं पोलीस चौकशीत आरोपीनं कबूल केले. 

१२ फेब्रुवारीला पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह झुडुपांमध्ये सापडला होता. या महिलेचे वय ३५-४० दरम्यान होते. ओढणीने गळा दाबून महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी महिलेचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला. पोलीस सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहेत. नवी मुंबई पोलिसांनी या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना कळवली होती. त्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी एक महिला बेपत्ता झाल्याचं रिपोर्ट लिहिला होता. पोलिसांनी तपास केला तेव्हा या बेपत्ता महिलेचाच मृतदेह होता. 

पोलिसांनी मृत महिलेच्या पतीशी संपर्क साधला. पतीने सांगितले की, महिला क्लीनर म्हणून काम करायची. काही दिवसांपासून ती बेपत्ता होती. त्यानंतर महिलेच्या फोनची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा तिचे संबंध राजकुमारसोबत असल्याचं समोर आले. राजकुमार हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले. तेव्हा खाकीचा धाक दाखवताच आरोपीने सर्व गुन्हा कबूल केला. 

चौकशीत आरोपीने सांगितले की, ही महिला माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. महिलेच्या मागणीला मी कंटाळून गेलो होतो. त्यामुळे तिच्यापासून सुटका व्हावी असा मी प्लॅन आखला. महिलेला भेटण्यासाठी बोलावले. त्याने ओढणीने तिचा गळा दाबून खून केला. हाऊसिंग सोसायटीजवळच असलेल्या झाडात महिलेचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करत चौकशीला सुरुवात केली आहे. 

काय आहे निक्की हत्या प्रकरण?१४ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी एका गावातील ढाब्यात फ्रीजमध्ये निक्कीचा मृतदेह आढळला. निक्की तिचा बॉयफ्रेंड साहिल गेहलोतसोबत लिव्ह-इनमध्ये राहायची. मात्र साहिलचे लग्न त्याच्या नातेवाईकांनी दुसऱ्या ठिकाणी निश्चित केले होते. यानंतर निक्की आणि साहिलमध्ये भांडण झाले. ९-१० फेब्रुवारीच्या रात्री साहिलने निक्कीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कारमधून नेले. यानंतर साहिलने वाटेतच तिचा खून करून मृतदेह त्याच्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला.