शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दुर्मिळ आजाराने ग्रस्त गर्भवती महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म

By धीरज परब | Updated: March 28, 2023 16:35 IST

रुग्णाच्या शरीरातील खालच्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी अरुंद झाली होती. परिणामी, शरीराच्या खालच्या भागात रक्तपुरवठा कमी झाला होता.

मीरारोड - दुर्मिळ ताकायासुच्या आर्टेरिटिस असलेल्या २८ वर्षीय महिलेचे यशस्वी बाळंतपण करण्यात मीरारोड मधील एका खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे . त्या महिलेने २.४ किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. 

भाईंदरला राहणारी गृहिणी गरोदर राहिल्याने खूश होती. मात्र तीन महिने होत नाही तोच तिला ताकायासु आर्टेरिटिस नावाची दुर्मिळ स्थिती आढळून आली. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तिला पुढे महाधमनी कोऑरक्टेशनचे (ज्यात ऱ्हदयाला पंपिगसाठी अधिक जोर द्यावा लागतो) निदान झाले. त्यामुळे गर्भधारणा तिच्यासाठी जीवघेणी ठरण्याची शक्यता पाहता तिला गर्भधारणा त्वरित थांबविण्याचा सल्ला दिला गेला होता .  

मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाच्या  सल्लागार स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. राजश्री तायशेटे - भासले यांनी सांगितले कि , गरोदरपणाच्या ९ महिन्यांत सदर रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात  दाखल झाली.  तिला उच्च रक्तदाब होता. तिला ताकायासु आर्टेरिटिस नावाची दुर्मिळ स्थिती होती जी रक्तवाहिन्यांचा दाहक रोग म्हणून ओळखला जातो. हा विकारांचा एक समूह आहे ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये दाह होतो, मुख्यतः महाधमनी प्रभावित होते.

काउंसिलिंगनंतर, कार्डियाक ऍनेस्थेसिया टीमसह निवडक एलएससीएस करण्यात आले. डॉ. रूपा मेपाणी आणि डॉ. केदारेश्वर पोटे यांनी सांगितले की, २.४ किलोचे बाळ जन्माला घालण्यात आम्हाला यश आले असून हे एक आव्हान होते. शस्त्रक्रियेनंतरचा तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.  या स्थितीतील प्रसूती नेहमीच गुंतागुंतीची असते परंतु महिलेने चांगला प्रतिसाद दिला. स्ट्रोक, आकस्मिक मृत्यू, हृदयाचे कार्य बंद पडणे इत्यादी गुंतागुंत आढळून येतात. आता महिला पूर्णतः बरी झाली असून स्वतःच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.  या गर्भधारणेमुळे माझ्या जीवाला  धोका आहे याची माहिती असून देखील बाळाला जन्म देण्याची इच्छा असल्याने गर्भधारणा न थांबविण्याचा निर्णय घेतला असे तिने सांगितले.  

तर रुग्णाच्या शरीरातील खालच्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी अरुंद झाली होती. परिणामी, शरीराच्या खालच्या भागात रक्तपुरवठा कमी झाला होता. साधारणपणे, अशी स्थिती असताना रुग्णांना गर्भधारणा थांबविण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु या रुग्णाने गर्भधारणा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अशा रूग्णांना सिझेरियन विभागाची आवश्यकता असते कारण त्योनीमार्गाद्वारे प्रसूती होऊ शकत नाही. ऍनेस्थेसिया देखील आव्हानात्मक होते. बाळ जन्मल्यानंतर अशा रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. ही शस्त्रक्रिया अघटित होती आणि आता रुग्णाला तिच्या मुख्य धमनी अरुंद करण्यासाठी उपचारांची आवश्यकता आहे ज्याला वैद्यकीय भाषेत महाधमनी कोऑर्टेशन म्हणतात असे कन्सल्टंट कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. मयुरेश प्रधान म्हणाले .