शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या

By राजकुमार जोंधळे | Updated: June 2, 2025 20:59 IST

लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गेला. तेथे शिडीला त्याने गळफास घेतल्याचे आढळले.

राजकुमार जाेंधळे 

लातूर - जोतिबावरून परतताना परळी रेल्वे स्थानक समजून लातूर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या ३१ वर्षीय तरुणाने लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी १० वाजता समाेर आली. त्याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. नवनाथ वसंत चिवडे असे मृताचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, परळी वैजनाथ (जि. बीड) येथील हाेळकर चाैक परिसरात वास्तव्याला असलेला तरुण नवनाथ वसंत चिवडे हा चार दिवसांपूर्वी भावाला मी जोतिबा (जि. काेल्हापूर) देवाला जात आहे, असे सांगून घराबाहेर पडला. जोतिबावरून परळीकडे परतताना रविवारी रात्री ताे चुकीने लातूर रेल्वे स्थानकावर उतरला. रेल्वे स्थानकावरून बाहेर पडल्यानंतर त्याने भावाला माेबाइलवर संपर्क केला. भावाने सांगितले, वाट चुकली तरी नवीन रेणापूर नाका येथील बसस्थानकात जा... तेथे परळी वैजनाथला येणाऱ्या बसेस लागतील. भावाला ताे हाे म्हणाला...आणि त्याने माेबाइल बंद केला.

त्यानंतर ताे पहाटेपर्यंत परळीतील घरी परतलाच नाही. वाट चुकल्याने ताे रात्रभर भटकत राहिला. लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गेला. तेथे शिडीला त्याने गळफास घेतल्याचे आढळले. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक संताेष पाटील, सहायक पाेलिस उपनिरीक्षक विलास फुलारी यांच्यासह चार्ली पथकाने भेट देत पाहणी करुन पंचनामा केला. मृत नवनाथच्या पश्चात आई, दाेन भाऊ, पत्नी, दाेन मुले आहेत.

१० वाजता बांधकाम मजूर आल्यानंतर घटना समजली...बांधकामावरील मजूर साेमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आले असता, त्यांना बांधकामाच्या शिडीला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याची माहिती घरमालकाला दिली. विवेकानंद चाैक ठाण्याला त्यांनी कळविले. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

खिशामध्ये आधार कार्ड; मयताची पटली ओळख...मयताच्या खिशाची तपासणी केल्यानंतर पाेलिसांना आधार कार्ड आढळून आले. दरम्यान, या आधार कार्डावरूनच तरुणाची ओळख पटली. याची माहिती पाेलिसांनी तातडीने त्याच्या परळी येथील कुटुंबीयांना दिली. माहिती समजल्यानंतर परळी येथून भावाने काही वेळात लातुरात धाव घेतली.

पाच वर्षांपासून पत्नी राहते माहेरी...नवनाथ याची पत्नी पाच वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील माहेरी राहत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. काैटुंबिक कारणामुळेही त्याची मानसिक स्थिती बरी नव्हती, असे भावाने पाेलिसांना सांगितले. याच नैराश्यातून त्याने हे टाेकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.