शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चोरांची अनोखी शक्कल, चक्क ५०० टन लोखंडी पूल गायब; गावकऱ्यांनी डोक्यावर हात मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 15:40 IST

मजेशीर बाब म्हणजे चोरांनी सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच हा पूल कापला आणि गाड्यांमध्ये भरून घेऊन गेले.

आजपर्यंत तुम्ही अनेक चोरीचे किस्से ऐकले असतील. बातम्या वाचल्या असतील किंवा बॉलिवूड सिनेमात चोरीच्या घटनांची दृश्यही पाहिले असतील. परंतु बिहारच्या रोहतास जिल्ह्यात झालेल्या एका चोरीने प्रशासनाची झोप उडवली आहे. या अजब चोरीचा किस्सा सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलीस या घटनेतील चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

याठिकाणी बनावट अधिकारी बनून आलेल्या चोरांनी ३ दिवसांत ६० फूट लांब आणि ५०० टन वजनी लोखंडी पूलच चक्क गायब केल्याचा प्रकार घडला आहे. मजेशीर बाब म्हणजे चोरांनी सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच हा पूल कापला आणि गाड्यांमध्ये भरून घेऊन गेले. हा सर्व कारनामा दिवसाढवळ्या घडला आणि कुणालाही चोरीची जराही भनक लागली नाही. परंतु घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे प्रशासनही थक्क झाले आहे. हे संपूर्ण प्रकरण नसरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमियावरचे आहे. येथे १९७२ च्या सुमारास आरा कॅनॉल कालव्यावर लोखंडी पूल बांधण्यात आला होता. चोरट्यांनी चतुराईने तीन दिवसांत हा पूल कापला आणि नंतर त्याचे लोखंड ट्रकमध्ये भरून तेथून छू मंतर झाले. हा पूल तोडण्यासाठी बुलडोझर, गॅस कटरचाही वापर करण्यात आला.

संपूर्ण गाव आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक

चोरट्यांनी एवढ्या हुशारीने ही घटना घडवली की, गावकऱ्यांपासून ते स्थानिक कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच नकळत चोरांच्या फसवणुकीत बळी पडले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी म्हणून त्यांनी गावात पोहोचून विभागीय आदेशाचे पालन करून पुल कापण्याचे काम सुरू केले. अशाप्रकारे सुमारे ६० फूट लांब आणि १२ फूट उंचीचं लोखंड चोरीला गेला. ही बाब उघडकीस आल्यानंतर कनिष्ठ अभियंता अर्शद कमान शमसी यांनी सांगितले की, चोरांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चोरांनी लढवली शक्कल

चोरी सुद्धा डोकं लावतात असे म्हणतात. चोरट्यांनी त्याचा वापर केला. वास्तविक, लोखंडी पूल जीर्ण झाला होता, त्यामुळे त्याला समांतर काँक्रिटचा पूल विभागाच्या वतीने बनवण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी अनेकवेळा लोखंडी पूल काढण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाचा सहारा घेत चोरट्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अर्जानंतर विभागीय आदेशानुसार पूल काढण्यासाठी आलो आहे. असं सांगत सर्व लोखंड घेऊन पसार झाले.