शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसनेच घात केला; मुलाच्या मृत्यूनंतर आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:49 IST

अवघ्या काही सेकंदानंतर त्याठिकाणी पोहचलेल्या आई वडिलांनी मुलगा सिद्धार्थचा किंचाळण्याचा आवाज ऐकला.

गुरुग्राम – कोरोना काळानंतर पुन्हा एकदा शाळा उत्साहात सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्कूल बस, व्हॅनही पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सोमवारी दिल्लीमध्ये घडलेल्या एका घटनेने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. याठिकाणी शाळकरी मुलाला स्कूल बसनं चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ही बातमी ऐकून दिल्लीच्या गुरुग्राम परिसरात प्रत्येक आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या बसमध्ये कंडक्टर नसल्याने ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे. मुलाला खाली उतरवल्यानंतर ड्रायव्हरनं मागे न पाहता थेट गाडी पुढे नेली. तेव्हा बसचा धक्का लागू मुलगा खाली पडला आणि त्याच्यावरून गाडीचे चाक गेले. या दुर्दैवी घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेनंतर मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

गुरुग्रामच्या सेक्टर ७८ च्या शिकोहपूर स्टॉपवर ही दुर्घटना घडली. अवघ्या काही सेकंदानंतर त्याठिकाणी पोहचलेल्या मुलाच्या आई वडिलांनी मुलगा सिद्धार्थचा किंचाळण्याचा आवाज ऐकला. ते धावत गेले त्यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु बस थांबली नाही. जखमी अवस्थेत मुलाला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. संध्याकाळी ५ वाजता या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूमुळे आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. परंतु मुलगा आता कायमचा दुरावला. या घटनेचा जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रत्येक आई वडिलांच्या मनाला पडला आहे.

काय घडलं त्या दिवशी?

अलीकडेच सिद्धार्थचा चौथा बर्थ डे झाला होता. तो लिटील वर्ल्ड प्ले स्कूलमध्ये शिकत होता. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत होता. बस त्याच्या घराजवळ थांबली, तेव्हा मुलगा खाली उतरत होता तितक्यात बस चालकाने मागे वळून न पाहता गाडी पुढे नेली. दररोज १.३० वाजता गाडी बसस्टॉपवर येते परंतु त्यादिवशी गाडी १० मिनिटं लवकर आली होती. जखमी अवस्थेत पालकांनी मुलाला हॉस्पिटलला नेले त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालावली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये कंडक्टर असता तर कदाचित सिद्धार्थ आज जिवंत असता. मात्र तो नव्हता आणि बसचालकाने हलगर्जीपणा केला.

काय आहे नियम?

अनेक वेळा पालक मुलाला घेण्यासाठी उशिरा पोहोचल्याचेही दिसून येते. बसमधून उतरल्यानंतर मुलाला पालकांच्या ताब्यात द्यावे, असा नियम असला, तरी तसे होत नाही. जर पालक स्टॉपवर पोहोचले नाहीत तर त्यांना बोलावून घ्या आणि जर बस आधी आली असेल तर त्यांनी त्यांच्या वेळेपर्यंत तिथेच थांबावे. पालक आल्याशिवाय मुलाला रस्त्यावर सोडू नये. ४० किमी प्रतितास वेगाचे पालन करण्यासाठी स्पीड गव्हर्नर बसवण्याचा नियम आहे. तरीही शालेय वाहनात त्याची तपासणी केली जात नाही.