शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसनेच घात केला; मुलाच्या मृत्यूनंतर आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:49 IST

अवघ्या काही सेकंदानंतर त्याठिकाणी पोहचलेल्या आई वडिलांनी मुलगा सिद्धार्थचा किंचाळण्याचा आवाज ऐकला.

गुरुग्राम – कोरोना काळानंतर पुन्हा एकदा शाळा उत्साहात सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्कूल बस, व्हॅनही पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सोमवारी दिल्लीमध्ये घडलेल्या एका घटनेने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. याठिकाणी शाळकरी मुलाला स्कूल बसनं चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ही बातमी ऐकून दिल्लीच्या गुरुग्राम परिसरात प्रत्येक आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या बसमध्ये कंडक्टर नसल्याने ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे. मुलाला खाली उतरवल्यानंतर ड्रायव्हरनं मागे न पाहता थेट गाडी पुढे नेली. तेव्हा बसचा धक्का लागू मुलगा खाली पडला आणि त्याच्यावरून गाडीचे चाक गेले. या दुर्दैवी घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेनंतर मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

गुरुग्रामच्या सेक्टर ७८ च्या शिकोहपूर स्टॉपवर ही दुर्घटना घडली. अवघ्या काही सेकंदानंतर त्याठिकाणी पोहचलेल्या मुलाच्या आई वडिलांनी मुलगा सिद्धार्थचा किंचाळण्याचा आवाज ऐकला. ते धावत गेले त्यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु बस थांबली नाही. जखमी अवस्थेत मुलाला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. संध्याकाळी ५ वाजता या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूमुळे आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. परंतु मुलगा आता कायमचा दुरावला. या घटनेचा जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रत्येक आई वडिलांच्या मनाला पडला आहे.

काय घडलं त्या दिवशी?

अलीकडेच सिद्धार्थचा चौथा बर्थ डे झाला होता. तो लिटील वर्ल्ड प्ले स्कूलमध्ये शिकत होता. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत होता. बस त्याच्या घराजवळ थांबली, तेव्हा मुलगा खाली उतरत होता तितक्यात बस चालकाने मागे वळून न पाहता गाडी पुढे नेली. दररोज १.३० वाजता गाडी बसस्टॉपवर येते परंतु त्यादिवशी गाडी १० मिनिटं लवकर आली होती. जखमी अवस्थेत पालकांनी मुलाला हॉस्पिटलला नेले त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालावली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये कंडक्टर असता तर कदाचित सिद्धार्थ आज जिवंत असता. मात्र तो नव्हता आणि बसचालकाने हलगर्जीपणा केला.

काय आहे नियम?

अनेक वेळा पालक मुलाला घेण्यासाठी उशिरा पोहोचल्याचेही दिसून येते. बसमधून उतरल्यानंतर मुलाला पालकांच्या ताब्यात द्यावे, असा नियम असला, तरी तसे होत नाही. जर पालक स्टॉपवर पोहोचले नाहीत तर त्यांना बोलावून घ्या आणि जर बस आधी आली असेल तर त्यांनी त्यांच्या वेळेपर्यंत तिथेच थांबावे. पालक आल्याशिवाय मुलाला रस्त्यावर सोडू नये. ४० किमी प्रतितास वेगाचे पालन करण्यासाठी स्पीड गव्हर्नर बसवण्याचा नियम आहे. तरीही शालेय वाहनात त्याची तपासणी केली जात नाही.