शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

फसवणूक प्रकरणी अटकेतील माजी आमदार कुशवाहची रत्नागिरीला ३०० एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 19:22 IST

विविध राज्यांतील दोन ते तीन हजार गुंतवणूकदारांना सुमारे १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी आमदार बनवारीलाल कुशवाहची रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडगे येथे सुमारे ३०० एकर जमीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे. 

औरंगाबाद : गरिमा रियल इस्टेट अ‍ॅण्ड अलाईड लिमिटेड या नावाने कंपनी स्थापन करून विविध राज्यांतील दोन ते तीन हजार गुंतवणूकदारांना सुमारे १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी आमदार बनवारीलाल कुशवाहची रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडगे येथे सुमारे ३०० एकर जमीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे. 

कुशवाहला काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने धौलापूर कारागृहातून ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत असताना कुशवाहने जमीन खरेदीची माहिती दिली होती. ही माहिती खरी निघाली असून, जमीन खरेदीचे अनेक खरेदीखत आर्थिक गुन्हे शाखेने मिळविले आहेत. या मालमत्तेच्या विक्रीस मनाई करण्याबाबतचे पत्र रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

धौलपूर (राजस्थान) येथील कुशवाह याने मोठे व्याज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील ३५० जणांची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदार अशोक बापूराव कुºहे यांच्या तक्रारीवरून गरिमा रियल इस्टेट कंपनीचे चेअरमन माजी आमदार बनवारीलाल कुशवाह, संचालक शिवराम कुशवाह, बालाकिशन कुशवाह यांच्यासह आठ संचालकांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बनवारीलाल कुशवाहला धौलपूरच्या कारागृहातून ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या पैशातून रत्नागिरी जिल्ह्यात ३०० एकर जमीन खरेदी केल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने या शेतजमिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी रत्नगिरी जिल्ह्यातील लांंजा तालुक्यातील कोंडगे गावात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याची खरेदीखते हाती लागली आहेत. मखनलाल कुशवाह, शिवराम कुशवाह, गौरीलाल कुशवाह यांच्या नावावर या जमिनीची खरेदी केल्याचे दिसून येत आहे. जमिनीची खरेदी जरी संचालक मंडळातील सदस्यांच्या वैयक्तिक नावावर केली असली तरी या जमिनीचा मोबदला मात्र कंपनीच्या खात्यातून झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.  

विक्री करून गुंतवणूकदारांची देणी चुकती करावीठग कुशवाहने रत्नागिरी येथे जमीन खरेदी केल्याची माहिती मिळताच ही मालमत्ता कोणालाही विक्री होऊ नये म्हणून रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे, तसेच अनेकांची फसवणूक करून ही जमीन खरेदी केल्याने ही जमीन शासनाने जप्त करीत न्यायालयामार्फ त विक्री करून गुुंतवणूकदारांची देणी चुकती करावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली जाणार आहे. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असली तरी त्यातून गुंतवणूकदारांना दिलासा मिळू शकतो, असे पोलीस निरीक्षक नवले यांनी सांगितले.

३५० जणांची यादी ग्वाल्हेर कोर्टाला पाठविलीकुशवाहने देशातील जवळपास ३ हजार लोकांना फसविल्याने ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सेबीने त्याची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेची लवकरच विक्री होऊन गुुंतवणूकदारांची देणी परत केली जाणार आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील ३५० गुंतवणूकदारांची यादी आर्थिक गुन्हे शाखेने ग्वाल्हेर उच्च न्यायालयाला पाठविली आहे.

कुशवाह पुन्हा धौलपूरच्या कारागृहात रवानाठग बनवारीलाल कुशवाहची सात दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपली. त्यामुळे त्याला पुन्हा धौलपूरच्या कारागृहात पाठविण्यात येत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस