शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बिल्डर आत्महत्या: ३० कोटी रुपये कर्जाचे आमिष; ६८ लाखांना फसवल्यामुळे आत्महत्या

By राम शिनगारे | Updated: September 23, 2022 21:45 IST

जवाहरनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा. अनिल यांना काही बड्या व्यावसायिकांकडूनही त्रास होता. त्यांनीही पैशांसाठी तगादा लावला होता.

औरंगाबाद : नामांकित बांधकाम व्यावसायिक अनिल अग्रहारकर यांना एकाने ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून ६८ लाख रुपये घेतले. मात्र, कर्ज काही दिले नाहीत. त्याउलट घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनिल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद अनिल यांच्या भावाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून भागवत यशवंत चव्हाण (रा. प्लॉट नं. ४, शिवदत्त हौसिंग सोसायटी, एन ८, सिडको) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणात मृताचे भाऊ दिलीप यांनी शुक्रवारी तक्रार दिली. या तक्रारीनुसार अनिल यांच्या डायरीमधील नोंदीनुसार ‘आरोपी भागवत चव्हाण ३० कोटी रुपयांचे लोन देणार होता. त्यासाठी आरटीजीएस आणि रोख स्वरुपात ६८ लाख रुपये त्याने घेतले. आरोपीने पैसे घेऊनही कर्ज मिळवून दिले नाही, त्यामुळे अडचणीत आलो आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे,’ असे नमूद केले होते. ९ महिन्यांपासून अनिल हे बँकेतून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याचवेळी त्यांची अक्षय सलामे (रा. पैठणरोड) आणि महेश गाडेकर (रा. येवला, जि. नाशिक) यांनी भागवत चव्हाण याच्याशी ओळख करून दिली होती. चव्हाण यांनी ३० कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो, त्यासाठी ७० लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानुसार अनिल यांनी ६८ लाख रुपये दिले होते. चार दिवसांपूर्वी भागवत चव्हाण हे अनिल यांच्या घरी आले होते. त्यांनी दुसऱ्याच दिवशी ३ कोटी रुपये रोख आणि ६ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देतो, असे स्पष्ट केले होते; परंतु त्याने ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत. त्याच दिवशी चव्हाण यांनी अनिल यांना इचलकरंजी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटीस घेऊन गेले.

त्याठिकाणी त्यांनी अनिल यांना ३० कोटी रुपये कर्ज देणार आहे, तोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही करू नका, असे सांगितल्याचेही फिर्यादीत म्हटले. निरीक्षक पाटील यांच्या आदेशाने सपोनि दिलीप चंदन यांनी गुन्हा नोंद करत अधिक तपासासाठी सपोनि सुधीर वाघ यांच्याकडे दिला.

मोठी नावे चौकशीत समोर येणारअनिल यांना काही बड्या व्यावसायिकांकडूनही त्रास होता. त्यांनीही पैशांसाठी तगादा लावला होता. त्यांची नावे पोलीस तपासात समोर येतील तसेच अनिल यांच्या मोबाईलच्या सीडीआरवरून त्यांच्या संपर्कात कोण कोण होते, त्यांना कोण त्रास देत होते, याचाही तपास होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी