शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

औरंगाबादेत नोकरीचे आमिष दाखवून महिला पोलिसाकडून १४ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:27 IST

याप्रकरणी तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिला पोलीस कर्मचारी छावणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

औरंगाबाद : बँकेत शिपाईपदाची नोकरी लावते, अशी थाप मारून महिला पोलीस कर्मचारी, पती आणि सवतीने तिघांना १४ लाख ५० हजाराला फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिला पोलीस कर्मचारी छावणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

कन्नड तालुक्यातील वडाळी येथील सुनील अशोक गवळे यांचे शिक्षण ११ वीपर्यंत झाले आहे. सुनीलचा भाऊ राजेंद्र औरंगाबादेत म्हाडा कॉलनीत राहतो. २०१४ मध्ये सुनीलही राजेंद्रकडे राहण्यास होता. त्यावेळी त्याची ओळख शेख जाफर शेख उस्मान (रा. पोलीस कॉलनी, मिलकॉर्नर) याच्याशी झाली. त्यावेळी जाफर याने आपली बँकेत अनेक अधिकाऱ्यांशी ओळख असून, शिपाई म्हणून कायमस्वरुपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. एवढेच नव्हे तर दिनेश राठोड नावाच्या तरुणालाही आपणच नोकरी लावून दिली, असेही सांगितले. बँकेत शिपाईपदावर कायमस्वरुपी नोकरीसाठी ५ लाख रुपये लागतील. त्यासाठी पोलीस कॉलनीत घरी येऊन भेटण्यास सांगितले. 

सुनीलने मोबाईलवरून दिनेश राठोड याच्याकडे विचारणा केली असता शेख जाफर यानेच बँकेत नोकरी लावून दिली असून, लवकरच कायमस्वरुपाची आॅर्डर मिळणार असल्याचे सांगितले. जाफरच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने सुनील, राजेंद्र आणि संतोष यांना घेऊन जाफरच्या घरी गेला. त्यावेळी जाफर याने त्याच्या दोन बायकांची ओळख करून दिली. शेख हसिना ही पोलीस खात्यात तर दुसरी पत्नी शबाना ही आश्रमशाळेत नोकरी करीत असल्याचे सांगितले. नोकरी लावून देण्यासाठी ५ ते ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले.

यानंतर सुनीलने पैशाची जमवाजमव करून फेब्रुवारी २०१४ मध्ये जाफरचे घर गाठले. जाफर आणि हसिना यांच्याकडे रोख ५ लाख रुपये दिले. मार्च २०१४ मध्ये सुनील व त्याचा लहान भाऊ संतोष, सचिन आणि दिगंबर चव्हाण असे चौघे जण जाफरच्या घरी गेले. दिगंबर चव्हाणने ६ लाख, सचिन गवळी याने  साडेतीन लाख रुपये नोकरीसाठी दिले. त्यावेळी शेख हसिना आणि जाफर यांनी आठ दिवसांत शिपाई पदाची आॅर्डर देण्याची ग्वाही दिली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सुनीलने पोलिसात धाव घेतली. 

आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर गुन्हा दाखलसुनीलने पैशासाठी जाफर आणि हसिना यांच्याकडे तगादा लावला. त्यानंतर जाफरने पत्नी शबाना यांच्या सिल्लोड येथील हैदराबाद बँकेचे ५ लाख, ६ लाख आणि ३ लाख ५० हजार असे एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचे चेक दिले. हे चेक बँकेत टाकले असता अनादरित झाले. वारंवार पैसे मागूनही पैसे मिळत नसल्याने शेवटी सुनीलने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक नवले व पथकाने या तक्रारीची तपासणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात शेख जाफर, शेख हसिना, शेख शबाना या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसfraudधोकेबाजी