शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

माझ्या खिशात १००० रुपये, त्यातून अंत्यसंस्कार करा; बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 11:59 IST

सुधीरच्या सुसाईड नोटमध्ये पेपर मिल डीजीएम अजय दुरटकर आणि कंत्राटदार संजय दानव यांनी छळल्याचा आरोप केला आहे.

चंद्रपूर – बल्लारपूर येथील बिल्ट पेपर मिल कंपनी आणि कंत्राटदारांच्या छळाला कंटाळून एका कंत्राटी कामगाराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुधीर लोखंडे असं या कामगाराचे नाव आहे. गेल्या ९ महिन्यापासून सुधीर लोखंडे यांना काम मिळणे बंद झाले होते. ज्यामुळे सुधीर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या खचला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूरच्या विद्यानगर येथे राहणारा सुधीर पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा. ९ महिन्यापूर्वी त्याला कंपनीने कामावरून कमी केले. त्यामुळे तो त्रस्त होता. सुधीरच्या आईची तब्येत बिघडली होती. अशा परिस्थितीत सुधीर लोखंडे याच्यावर मानसिक आणि आर्थिक दडपण आले होते. याला कंटाळून अखेर सुधीर लोखंडे यांनी मृत्यूला कवटाळलं. सुधीरच्या मागे त्याची आई, पत्नी आणि २ मुले असं कुटुंब आहे.

सुधीरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने सुधीरला फासावर लटकलेला पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सुधीरचा मृतदेह खाली उतरवून तो पोस्टमोर्टमला पाठवला. पोलिसांनी तपास केला असता सुधीरच्या खिशात १ सुसाईड नोट आढळली. त्यात सुधीरने जे काही लिहिलं हे ऐकून कुटुंबाला अश्रू अनावर झाले.

सुधीरच्या सुसाईड नोटमध्ये पेपर मिल डीजीएम अजय दुरटकर आणि कंत्राटदार संजय दानव यांनी छळल्याचा आरोप केला आहे. सुधीरने या दोघांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पेपर मिल अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कलम ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत सुधीरच्या नोटमध्ये म्हटलं होतं की, माझ्या खिशात १ हजार रुपये आहेत, त्यातून अंत्यसंस्कार करा असं वाचून पत्नीने हंबरडा फोडला.

सुधीरचे नातेवाईक जयदास भगत यांनी सांगितले की, सुधीर मागील २५ वर्षापासून बल्लारपूरच्या पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करतोय. ९ महिन्यापूर्वी कंत्राटदाराने सुधीरला कामावरून काढून टाकले. तेव्हापासून तो तणावात आहे. त्याने पेपर मिल अधिकारी आणि कंत्राटदार यांची अनेकदा भेट घेतली परंतु त्याला काम मिळाले नाही. मानसिक छळ आणि आर्थिक दडपणाखाली येऊन त्याने अखेर जीवन संपवले असं भगत यांनी म्हटलं.