शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

शिक्षक ऑनलाईन तर विद्यार्थी वार्‍यावर जामनेर : सरल डाटाबेस प्रणाली ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.
राज्य शासनाच्या सरल डाटाबेस प्रणालीअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या इत्यंभूत माहितीमध्ये रक्तगटापासून ते आईवडिलांच्या बाबतीतील सर्व माहिती गोळा करून ती संगणकामध्ये भरावी असा हा आदेश आहे. ही सर्व माहिती गोळा करताना शिक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. आधीच प्रत्येक शाळांमध्ये शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजन, मुल्यांकनाची जबाबदारी यासह अनेक कामे शिक्षकांना ज्ञानार्जन करून करावी लागतात. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी इतर कामातच दिवसभर व्यस्त राहावे लागते. याचा विपरीत परिणाम हळूहळू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिक्षणावर होऊ लागल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात अडचणी
यावर कडी म्हणजे विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालकवर्गही आपली आणि आपल्या पाल्यांची माहिती देण्यासाठी मागे-पुढे करतात याचा फटका वेळेत माहिती न मिळण्यात होत आहे. ऑनलाईन प्रणाली असल्याने अनेकदा संगणकावर संबंधित साईटच उघडली जात नाही, याचाही परिणाम माहिती देण्यावर होतो आहे. अशा अनेक तक्रारींचा पाढा सध्या सर्वच शाळांच्या शिक्षकवर्गाकडून पुढे येऊ लागला आहे.

राज्य शासनाच्या व शिक्षण विभागाचा आदेश असल्याने मागितली ती सर्व माहिती देणे आमच्यावर बंधनकारक असले तरी दुसरीकडे मात्र संगणकाचीही बरीच मर्यादा असल्याने तासंनतास साईटच ओपन होत नाही. त्यामुळे या कामाला जास्त वेळ लागत आहे. तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही. शिवाय शासनाने माहिती देण्यासाठीची वेळ मर्यादा वाढवून दिल्यास योग्य ठरेल.
- सुमित अहिरे
गटशिक्षणाधिकारी, जामनेर