शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

शिक्षक ऑनलाईन तर विद्यार्थी वार्‍यावर जामनेर : सरल डाटाबेस प्रणाली ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.
राज्य शासनाच्या सरल डाटाबेस प्रणालीअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या इत्यंभूत माहितीमध्ये रक्तगटापासून ते आईवडिलांच्या बाबतीतील सर्व माहिती गोळा करून ती संगणकामध्ये भरावी असा हा आदेश आहे. ही सर्व माहिती गोळा करताना शिक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. आधीच प्रत्येक शाळांमध्ये शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजन, मुल्यांकनाची जबाबदारी यासह अनेक कामे शिक्षकांना ज्ञानार्जन करून करावी लागतात. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी इतर कामातच दिवसभर व्यस्त राहावे लागते. याचा विपरीत परिणाम हळूहळू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिक्षणावर होऊ लागल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात अडचणी
यावर कडी म्हणजे विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालकवर्गही आपली आणि आपल्या पाल्यांची माहिती देण्यासाठी मागे-पुढे करतात याचा फटका वेळेत माहिती न मिळण्यात होत आहे. ऑनलाईन प्रणाली असल्याने अनेकदा संगणकावर संबंधित साईटच उघडली जात नाही, याचाही परिणाम माहिती देण्यावर होतो आहे. अशा अनेक तक्रारींचा पाढा सध्या सर्वच शाळांच्या शिक्षकवर्गाकडून पुढे येऊ लागला आहे.

राज्य शासनाच्या व शिक्षण विभागाचा आदेश असल्याने मागितली ती सर्व माहिती देणे आमच्यावर बंधनकारक असले तरी दुसरीकडे मात्र संगणकाचीही बरीच मर्यादा असल्याने तासंनतास साईटच ओपन होत नाही. त्यामुळे या कामाला जास्त वेळ लागत आहे. तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही. शिवाय शासनाने माहिती देण्यासाठीची वेळ मर्यादा वाढवून दिल्यास योग्य ठरेल.
- सुमित अहिरे
गटशिक्षणाधिकारी, जामनेर