शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक ऑनलाईन तर विद्यार्थी वार्‍यावर जामनेर : सरल डाटाबेस प्रणाली ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.
राज्य शासनाच्या सरल डाटाबेस प्रणालीअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या इत्यंभूत माहितीमध्ये रक्तगटापासून ते आईवडिलांच्या बाबतीतील सर्व माहिती गोळा करून ती संगणकामध्ये भरावी असा हा आदेश आहे. ही सर्व माहिती गोळा करताना शिक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. आधीच प्रत्येक शाळांमध्ये शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजन, मुल्यांकनाची जबाबदारी यासह अनेक कामे शिक्षकांना ज्ञानार्जन करून करावी लागतात. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी इतर कामातच दिवसभर व्यस्त राहावे लागते. याचा विपरीत परिणाम हळूहळू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिक्षणावर होऊ लागल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात अडचणी
यावर कडी म्हणजे विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालकवर्गही आपली आणि आपल्या पाल्यांची माहिती देण्यासाठी मागे-पुढे करतात याचा फटका वेळेत माहिती न मिळण्यात होत आहे. ऑनलाईन प्रणाली असल्याने अनेकदा संगणकावर संबंधित साईटच उघडली जात नाही, याचाही परिणाम माहिती देण्यावर होतो आहे. अशा अनेक तक्रारींचा पाढा सध्या सर्वच शाळांच्या शिक्षकवर्गाकडून पुढे येऊ लागला आहे.

राज्य शासनाच्या व शिक्षण विभागाचा आदेश असल्याने मागितली ती सर्व माहिती देणे आमच्यावर बंधनकारक असले तरी दुसरीकडे मात्र संगणकाचीही बरीच मर्यादा असल्याने तासंनतास साईटच ओपन होत नाही. त्यामुळे या कामाला जास्त वेळ लागत आहे. तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही. शिवाय शासनाने माहिती देण्यासाठीची वेळ मर्यादा वाढवून दिल्यास योग्य ठरेल.
- सुमित अहिरे
गटशिक्षणाधिकारी, जामनेर