शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शिक्षक ऑनलाईन तर विद्यार्थी वार्‍यावर जामनेर : सरल डाटाबेस प्रणाली ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.

जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.
राज्य शासनाच्या सरल डाटाबेस प्रणालीअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या इत्यंभूत माहितीमध्ये रक्तगटापासून ते आईवडिलांच्या बाबतीतील सर्व माहिती गोळा करून ती संगणकामध्ये भरावी असा हा आदेश आहे. ही सर्व माहिती गोळा करताना शिक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. आधीच प्रत्येक शाळांमध्ये शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजन, मुल्यांकनाची जबाबदारी यासह अनेक कामे शिक्षकांना ज्ञानार्जन करून करावी लागतात. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी इतर कामातच दिवसभर व्यस्त राहावे लागते. याचा विपरीत परिणाम हळूहळू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिक्षणावर होऊ लागल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात अडचणी
यावर कडी म्हणजे विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालकवर्गही आपली आणि आपल्या पाल्यांची माहिती देण्यासाठी मागे-पुढे करतात याचा फटका वेळेत माहिती न मिळण्यात होत आहे. ऑनलाईन प्रणाली असल्याने अनेकदा संगणकावर संबंधित साईटच उघडली जात नाही, याचाही परिणाम माहिती देण्यावर होतो आहे. अशा अनेक तक्रारींचा पाढा सध्या सर्वच शाळांच्या शिक्षकवर्गाकडून पुढे येऊ लागला आहे.

राज्य शासनाच्या व शिक्षण विभागाचा आदेश असल्याने मागितली ती सर्व माहिती देणे आमच्यावर बंधनकारक असले तरी दुसरीकडे मात्र संगणकाचीही बरीच मर्यादा असल्याने तासंनतास साईटच ओपन होत नाही. त्यामुळे या कामाला जास्त वेळ लागत आहे. तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही. शिवाय शासनाने माहिती देण्यासाठीची वेळ मर्यादा वाढवून दिल्यास योग्य ठरेल.
- सुमित अहिरे
गटशिक्षणाधिकारी, जामनेर