शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंब पात्र

By admin | Updated: September 15, 2014 00:19 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी याकरिता एकूण १७ प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली. चार प्रकरणे अपात्र तर दोन प्रकरणे

वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी याकरिता एकूण १७ प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली. चार प्रकरणे अपात्र तर दोन प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सेलू तालुक्यात घोराड येथील मृतक महादेव गेंदालाल वरटकर, आकोली येथील मंगेश आंबटकर, वडगाव येथील लक्ष्मण कुमरे, तळोदी येथील लक्ष्मण बावणे, जुवाडी येथील सिद्धार्थ धवने, देवळी तालुक्यातील तांबा येथील संदेश रामदास वाघाडे, लोणी येथील मधुकर धारकर, कवठा (रेल्वे) येथील पुरणदास गायकवाड, आंजी (ब.) येथील प्रफुल्ल भोयर, टाकळी येथील पंढरी ठाकरे, बोरगाव (आ.) येथील विश्वनाथ टिपले या मृतकांच्या वारसदारांना तातडीची मदत देण्यात समितीने पात्र ठरविले आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील किसना डडमल आणि गौळ येथील अतुल भोयर या मृतकांची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. अपात्र प्रकरणांमध्ये आर्वी तालुक्यातील सायखेडा येथील शांताबाई ठाकरे, किन्हाळा येथील रघुनाथ पडधाम, आष्टी तालुक्यातील काकडदरा येथील सुरेश गुळभेले आणि देवळी तालुक्यातील कोल्हापूर (सि.) येथील मंगेश ठवळे या मृतकांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत, असेही अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)