शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंब पात्र

By admin | Updated: September 15, 2014 00:19 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी याकरिता एकूण १७ प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली. चार प्रकरणे अपात्र तर दोन प्रकरणे

वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी याकरिता एकूण १७ प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली. चार प्रकरणे अपात्र तर दोन प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सेलू तालुक्यात घोराड येथील मृतक महादेव गेंदालाल वरटकर, आकोली येथील मंगेश आंबटकर, वडगाव येथील लक्ष्मण कुमरे, तळोदी येथील लक्ष्मण बावणे, जुवाडी येथील सिद्धार्थ धवने, देवळी तालुक्यातील तांबा येथील संदेश रामदास वाघाडे, लोणी येथील मधुकर धारकर, कवठा (रेल्वे) येथील पुरणदास गायकवाड, आंजी (ब.) येथील प्रफुल्ल भोयर, टाकळी येथील पंढरी ठाकरे, बोरगाव (आ.) येथील विश्वनाथ टिपले या मृतकांच्या वारसदारांना तातडीची मदत देण्यात समितीने पात्र ठरविले आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील किसना डडमल आणि गौळ येथील अतुल भोयर या मृतकांची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. अपात्र प्रकरणांमध्ये आर्वी तालुक्यातील सायखेडा येथील शांताबाई ठाकरे, किन्हाळा येथील रघुनाथ पडधाम, आष्टी तालुक्यातील काकडदरा येथील सुरेश गुळभेले आणि देवळी तालुक्यातील कोल्हापूर (सि.) येथील मंगेश ठवळे या मृतकांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत, असेही अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)