शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे; तर हत्या जोगेंद्र कवाडे यांचा संवाद : द्रोणाचारी प्रवृत्ती असेल तर आणखी असे बलिदान होतील

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.

जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.
संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्रश्नउत्तराचा तास सुरू झाला. तेव्हा एका विद्यार्थ्यांने रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या झाली, तरी दोषींना शासन झालेले नाही? असा सवाल त्यांना विचारला. तेव्हा प्रा. कवाडे म्हणाले, की आत्महत्या झाल्यानंतर प्रसारमाध्यमातून जे वृत्त प्रसारीत झाले. त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी त्याची जात विचारली होती. रोहित हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्यामुळे रोहितसह त्याच्या चार सहकार्‍यांची चार महिन्यांपासून शिष्यवृत्ती विद्यापीठाने पाठपुरावा करूनही दिली नाही. अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही जो दबाव त्याच्यावर टाकला. त्यामुळे रोहितने आत्महत्या केली. समाजातील द्रोणाचारी प्रवृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही. तोपर्यंत अशा अनेक रोहितला बलिदान द्यावे लागेल, असे प्रा. कवाडे यांनी म्हटले.
...तर त्या देवावर बहिष्कार टाका
संमेलनात शीतल चौधरी या विद्यार्थिनीने प्रा. कवाडे यांना शनी शिंगणापूर येथे महिलांसाठी दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली, समाजात स्त्री-पुरुष समानता दिसते का? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रा. कवाडे म्हणाले, पूर्वीच्या काळात शनी देव तुमच्या पाठीमागे फिरत होता. आता तुम्ही शनी देवाच्या पाठीमागे फिरत आहेत. कुठल्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्यात येत असेल तर तुम्ही त्या देवावरही बहिष्कार टाका. त्याचा विचारही करू नका. जे पुरुष आणि महिला असा भेदभाव करतात. ते संविधानाचे द्रोही आहेत. त्याही पुढे जाऊन ते लोक देशद्रोही आहेत.
प्रस्तापित व्यवस्था तरुणांनी गाडून टाका
प्रा. कवाडे म्हणाले, की पुरोगामी चळवळीतील लोकांनी संत, महंत यांना जाती व्यवस्थेत राहणार्‍या लोकांनी वाटून घेतले आहे. त्यामुळे प्रस्तापित समाज व्यवस्थेतील ही विचारसरणी तरुणांनी गाडून टाकावी, असे आवाहन त्यांनी केले.