शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
4
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
5
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
6
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
8
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
11
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
12
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
13
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
14
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
15
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
16
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
17
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
18
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
19
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
20
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे; तर हत्या जोगेंद्र कवाडे यांचा संवाद : द्रोणाचारी प्रवृत्ती असेल तर आणखी असे बलिदान होतील

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.

जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.
संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्रश्नउत्तराचा तास सुरू झाला. तेव्हा एका विद्यार्थ्यांने रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या झाली, तरी दोषींना शासन झालेले नाही? असा सवाल त्यांना विचारला. तेव्हा प्रा. कवाडे म्हणाले, की आत्महत्या झाल्यानंतर प्रसारमाध्यमातून जे वृत्त प्रसारीत झाले. त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी त्याची जात विचारली होती. रोहित हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्यामुळे रोहितसह त्याच्या चार सहकार्‍यांची चार महिन्यांपासून शिष्यवृत्ती विद्यापीठाने पाठपुरावा करूनही दिली नाही. अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही जो दबाव त्याच्यावर टाकला. त्यामुळे रोहितने आत्महत्या केली. समाजातील द्रोणाचारी प्रवृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही. तोपर्यंत अशा अनेक रोहितला बलिदान द्यावे लागेल, असे प्रा. कवाडे यांनी म्हटले.
...तर त्या देवावर बहिष्कार टाका
संमेलनात शीतल चौधरी या विद्यार्थिनीने प्रा. कवाडे यांना शनी शिंगणापूर येथे महिलांसाठी दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली, समाजात स्त्री-पुरुष समानता दिसते का? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रा. कवाडे म्हणाले, पूर्वीच्या काळात शनी देव तुमच्या पाठीमागे फिरत होता. आता तुम्ही शनी देवाच्या पाठीमागे फिरत आहेत. कुठल्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्यात येत असेल तर तुम्ही त्या देवावरही बहिष्कार टाका. त्याचा विचारही करू नका. जे पुरुष आणि महिला असा भेदभाव करतात. ते संविधानाचे द्रोही आहेत. त्याही पुढे जाऊन ते लोक देशद्रोही आहेत.
प्रस्तापित व्यवस्था तरुणांनी गाडून टाका
प्रा. कवाडे म्हणाले, की पुरोगामी चळवळीतील लोकांनी संत, महंत यांना जाती व्यवस्थेत राहणार्‍या लोकांनी वाटून घेतले आहे. त्यामुळे प्रस्तापित समाज व्यवस्थेतील ही विचारसरणी तरुणांनी गाडून टाकावी, असे आवाहन त्यांनी केले.