शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे; तर हत्या जोगेंद्र कवाडे यांचा संवाद : द्रोणाचारी प्रवृत्ती असेल तर आणखी असे बलिदान होतील

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.

जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.
संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्रश्नउत्तराचा तास सुरू झाला. तेव्हा एका विद्यार्थ्यांने रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या झाली, तरी दोषींना शासन झालेले नाही? असा सवाल त्यांना विचारला. तेव्हा प्रा. कवाडे म्हणाले, की आत्महत्या झाल्यानंतर प्रसारमाध्यमातून जे वृत्त प्रसारीत झाले. त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी त्याची जात विचारली होती. रोहित हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्यामुळे रोहितसह त्याच्या चार सहकार्‍यांची चार महिन्यांपासून शिष्यवृत्ती विद्यापीठाने पाठपुरावा करूनही दिली नाही. अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही जो दबाव त्याच्यावर टाकला. त्यामुळे रोहितने आत्महत्या केली. समाजातील द्रोणाचारी प्रवृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही. तोपर्यंत अशा अनेक रोहितला बलिदान द्यावे लागेल, असे प्रा. कवाडे यांनी म्हटले.
...तर त्या देवावर बहिष्कार टाका
संमेलनात शीतल चौधरी या विद्यार्थिनीने प्रा. कवाडे यांना शनी शिंगणापूर येथे महिलांसाठी दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली, समाजात स्त्री-पुरुष समानता दिसते का? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रा. कवाडे म्हणाले, पूर्वीच्या काळात शनी देव तुमच्या पाठीमागे फिरत होता. आता तुम्ही शनी देवाच्या पाठीमागे फिरत आहेत. कुठल्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्यात येत असेल तर तुम्ही त्या देवावरही बहिष्कार टाका. त्याचा विचारही करू नका. जे पुरुष आणि महिला असा भेदभाव करतात. ते संविधानाचे द्रोही आहेत. त्याही पुढे जाऊन ते लोक देशद्रोही आहेत.
प्रस्तापित व्यवस्था तरुणांनी गाडून टाका
प्रा. कवाडे म्हणाले, की पुरोगामी चळवळीतील लोकांनी संत, महंत यांना जाती व्यवस्थेत राहणार्‍या लोकांनी वाटून घेतले आहे. त्यामुळे प्रस्तापित समाज व्यवस्थेतील ही विचारसरणी तरुणांनी गाडून टाकावी, असे आवाहन त्यांनी केले.