शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

आरटीई प्रवेशाबाबत शासन उदासिन प्रवेशाचे चित्र 7 ऑगस्टनंतर स्पष्ट होणार

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

पुणे: उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाने आरटीई प्रवेशासंदर्भातील चूकीचा अध्यादेश मागे घेवून पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्याव्या सुचना शिक्षण अधिका-यांना दिल्या.मात्र,प्रवेश घेण्यासाठी जाणा-या पालकांना शाळांकडून कोणतीही दाद दिली जात नाही.त्यात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंतिम निर्णय झालेला नाही.त्यामुळे येत्या 7 ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीनंतरच आरटीई प्रवेशाचे चित्र स्पष्ट होईल,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट केले जात आहे.

पुणे: उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाने आरटीई प्रवेशासंदर्भातील चूकीचा अध्यादेश मागे घेवून पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्याव्या सुचना शिक्षण अधिका-यांना दिल्या.मात्र,प्रवेश घेण्यासाठी जाणा-या पालकांना शाळांकडून कोणतीही दाद दिली जात नाही.त्यात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंतिम निर्णय झालेला नाही.त्यामुळे येत्या 7 ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीनंतरच आरटीई प्रवेशाचे चित्र स्पष्ट होईल,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट केले जात आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेशाबाबत राज्य शासनाने वेळोवेळी अनेक अध्यादेश प्रसिध्द केले. त्यामुळे शिक्षण विभागाला आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविताना अनेक अडचणी आल्या.त्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना शासनाने 30 एप्रिल रोजीचा अध्यादेश काडून आरटीई अंतर्गत केवळ पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र,या अध्यादेशामुळे दूर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने न्यायालयाने 30 एप्रिलच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. तसेच थांबलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. परिणामी शासनाने 23 जुलै रोजी अध्यादेश जाहीर करून पूर्व प्रथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश द्यावेत, असा अध्यादेश काढला. परंतु,अनेक शाळा या अध्यादेशानुसार प्रवेश देण्यास नकार देत असल्याने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व विविध विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे. दरम्यान न्यायालयातील सुनावणीवर अंतिम निर्णय होत नाही.तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविता येणार नाही, असे शिक्षण विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत शासन उदासिन असल्याचे दिसून येत आहे.
आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मुकुंद किर्दक म्हणाले,आरटीईची पहिली प्रवेश प्रक्रिया संपत आली असून ती पूर्ण केली जाणार असल्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले होते. पुढील प्रवेशाची फेरी केव्हा व कशी राबविण्यात येईल याचेही स्पष्टीकरण शासनाने न्यायालयाला देणे अपेक्षित आहे.परंतु,पालकांना चूकीची महिती देवून शिक्षण अधिकारी आरटीई प्रवेशासंदर्भात गोंधळ निर्माण करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याबाबत चालढकल करत आहेत.
पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करणा-या पालक अवंतिका सोनवणे म्हणाल्या, पौड रस्त्यावरील न्यू इंडिया स्कूल प्रवेश देण्यास नकार देत आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असून शासनाकडून आरटीईचे प्रवेश देण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत, असे शाळेकडून सांगितले जात आहे.