शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

आरटीई प्रवेशाबाबत शासन उदासिन प्रवेशाचे चित्र 7 ऑगस्टनंतर स्पष्ट होणार

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

पुणे: उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाने आरटीई प्रवेशासंदर्भातील चूकीचा अध्यादेश मागे घेवून पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्याव्या सुचना शिक्षण अधिका-यांना दिल्या.मात्र,प्रवेश घेण्यासाठी जाणा-या पालकांना शाळांकडून कोणतीही दाद दिली जात नाही.त्यात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंतिम निर्णय झालेला नाही.त्यामुळे येत्या 7 ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीनंतरच आरटीई प्रवेशाचे चित्र स्पष्ट होईल,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट केले जात आहे.

पुणे: उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाने आरटीई प्रवेशासंदर्भातील चूकीचा अध्यादेश मागे घेवून पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्याव्या सुचना शिक्षण अधिका-यांना दिल्या.मात्र,प्रवेश घेण्यासाठी जाणा-या पालकांना शाळांकडून कोणतीही दाद दिली जात नाही.त्यात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंतिम निर्णय झालेला नाही.त्यामुळे येत्या 7 ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीनंतरच आरटीई प्रवेशाचे चित्र स्पष्ट होईल,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट केले जात आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेशाबाबत राज्य शासनाने वेळोवेळी अनेक अध्यादेश प्रसिध्द केले. त्यामुळे शिक्षण विभागाला आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविताना अनेक अडचणी आल्या.त्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना शासनाने 30 एप्रिल रोजीचा अध्यादेश काडून आरटीई अंतर्गत केवळ पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र,या अध्यादेशामुळे दूर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने न्यायालयाने 30 एप्रिलच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. तसेच थांबलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. परिणामी शासनाने 23 जुलै रोजी अध्यादेश जाहीर करून पूर्व प्रथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश द्यावेत, असा अध्यादेश काढला. परंतु,अनेक शाळा या अध्यादेशानुसार प्रवेश देण्यास नकार देत असल्याने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व विविध विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे. दरम्यान न्यायालयातील सुनावणीवर अंतिम निर्णय होत नाही.तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविता येणार नाही, असे शिक्षण विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत शासन उदासिन असल्याचे दिसून येत आहे.
आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मुकुंद किर्दक म्हणाले,आरटीईची पहिली प्रवेश प्रक्रिया संपत आली असून ती पूर्ण केली जाणार असल्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले होते. पुढील प्रवेशाची फेरी केव्हा व कशी राबविण्यात येईल याचेही स्पष्टीकरण शासनाने न्यायालयाला देणे अपेक्षित आहे.परंतु,पालकांना चूकीची महिती देवून शिक्षण अधिकारी आरटीई प्रवेशासंदर्भात गोंधळ निर्माण करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याबाबत चालढकल करत आहेत.
पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करणा-या पालक अवंतिका सोनवणे म्हणाल्या, पौड रस्त्यावरील न्यू इंडिया स्कूल प्रवेश देण्यास नकार देत आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असून शासनाकडून आरटीईचे प्रवेश देण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत, असे शाळेकडून सांगितले जात आहे.