शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठ देणार महाविद्यालयांना तंबी?

By admin | Updated: July 7, 2016 00:57 IST

आंदोलनामुळे त्रस्त : विद्यार्थ्यांनाही लावणारा चाप

आंदोलनामुळे त्रस्त : विद्यार्थ्यांनाही लावणारा चापनाशिक : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भांडणार्‍या विद्यार्थी संघटना सनदशीर मार्गाचा अवलंब न करता आक्रमक भूमिका घेत असल्याच्या अनुभवामुळे पुणे विद्यापीठाने चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही मुद्द्यावर आंदोलन करताना विद्यार्थी संघटना अधिकार्‍यांना अवमानकारक भाषेचा वापर करीत असल्याचा अनुभव आल्याने विद्यापीठाने आता विद्यार्थी संघटनांकडे जाऊ नये यासाठी संबंधित महाविद्यालयांनाच तंबी देणार असल्याचे समजते. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या, ४६ शैक्षणिक विभाग आणि ४७४ महाविद्यालये असा मोठा कारभार पुणे विद्यापीठामार्फत चालतो. नाशिक, नगर आणि पुणे अशा तीन जिल्‘ातील महाविद्यालये आणि विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. इतका मोठा विस्तार असल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचे अनेकदा प्रश्न निर्माण होतात. विद्यापीठाच्या अधिकृत मंडळांवर याविषयीदेखील चर्चा होते. कित्येकदा विद्यार्थी संघटना विद्यापीठाकडून झालेल्या चुका निदर्शनास आणून देतात. त्यातून कित्येकदा मार्ग निघतो, काही प्रश्नांना विलंबदेखील लागतो. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी विद्यार्थी संघटनांची भूमिका असते. त्यामुळे विद्यार्थी संघटना आंदोलनाचा मार्ग अवलंबितात. मात्र अशा प्रकारचे आंदोलन करताना विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्यापीठाचे किंवा उपकेंद्रांचे अधिकारी वेठीस धरले जातात. विद्यार्थी संघटनांचे काही अतिउत्साही कार्यकर्ते संबंधित अधिकारी आणि व्यवस्थेविषयी अवमानकारक विधाने करीत असल्याची बाब विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी कथन केल्यामुळे सदर आंदोलने विद्यापीठापर्यंत येऊच नये यासाठी विचारविनिमय केला जात आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही प्रश्न असले तरी ते महाविद्यालयीन पातळीवरच सोडविले जावेत, महाविद्यालयाने विद्यापीठ आणि संबंधित विद्यार्थ्यांचा समन्वय साधून कार्य करावे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे प्राथमिक काम महाविद्यालयीन पातळीवरच व्हावे यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांना सुचना देणार असल्याचे समजते. विद्यार्थी संघटनांकडे जाणारच नाहीत याची खबरदारी घ्यावी अन्यथा विद्यापीठालाच याबाबत जबाबदार धरण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. सध्या अभियांत्रिकीचा मुद्दा ज्वलंत असल्यामुळे तूर्तास लागलीच याविषयी चर्चा होणार नसली तरी येत्या काही दिवसांत याबाबतचे धोरण निश्चित करून विद्यार्थ्यांचे प्रश्न महाविद्यालयीन पातळीवरच सोडविण्याबाबत तोडगा काढला जाणार आहे. तशी यंत्रणा पुणे विद्यापीठात कार्यान्वित करण्याचादेखील विचार असून, संबंधित शाखा केवळ निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करणार आहेत. --जोड देत आहे---