शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पॉलिटेक्निक दीक्षांत समारंभ

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

तरुणांनो, राष्ट्रविकासाला प्राधान्य द्या

तरुणांनो, राष्ट्रविकासाला प्राधान्य द्या
संजय चहांदे : शासकीय तंत्रनिकेतनचा दीक्षांत समारंभ थाटात
(फोटो आहे- रॅपमध्ये)
नागपूर : देशाचा विकास करणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. केवळ शासनावर विसंबून न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने त्याकरिता प्रयत्नरत असायला हवे. विशेषत: जागतिकीकरणाच्या या युगात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काम करीत असले तरी तरुणांनी राष्ट्रविकासाचा नेहमीच विचार करायला हवा, असे मत राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांनी केले. स्थापनेची शंभर वर्षे साजरी करीत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १७ वा दीक्षांत सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला महासत्ता करण्यासाठी तांत्रिक संशोधनावर भर देण्याची गरज आहे. तांत्रिक शोध थांबला तर देशाच्या विकासाची गती थांबेल. तंत्रज्ञानात प्रगती करण्याची फार मोठी जबाबदारी ही शासकीय तंत्रनिकेतनची आहे, असे चहांदे म्हणाले.
गुलाबराव ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षणाला दर्जेदार करण्यासंबंधीच्या मुद्यांवर भर दिला. डॉक्टर व इंजिनीअर हे देशाचे आधारस्तंभ आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी शिक्षण पद्धतीत गुणात्मक बदल करणे आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या कार्याकडे जोमाने लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. थोरात यांनी शैक्षणिक अहवाल वाचनातून शंभर वर्षांच्या उज्ज्वल यशाची माहिती दिली. संचालन दिशा खंडारे यांनी केले तर प्रा. आर.ई. गजभिये यांनी आभार मानले.
७०६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान
१७ व्या दीक्षांत समांरभात ७०६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. यंदा स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील वैभव राजेश्वर घुशे या विद्यार्थ्याने सर्वाधिक सहा सुवर्णपदके पटकावली. हिमांशू संजय करडभाजणे (अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी), कृतिका उमाजी पांडे (वस्त्रनिर्माण तंत्रज्ञान), दीपक केशवराव सोनवणे (स्वयंचल अभियांत्रिकी) यांचा प्रत्येकी तीन सुवर्णपदके देऊन सत्कार करण्यात आला.