शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी शेतमजुरांचा नांदगावला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:30 IST

नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली.

ठळक मुद्देभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुक्याची अवस्था काळजी करावी अशी असून, तालुक्याच्या ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर शाळेत पदे रिक्त असल्याने शिकवायला शिक्षक नाही, वनजमिनींच्या तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या अनेक दाव्यांपैकी बहुतांशी दाव्यांचा निर्णय होऊ न शकल्याने ते प्रलंबित आहेत. ते निकाली काढावेत तसेच राज्यघटना संविधान प्रत दिल्ली येथे जाळणाऱ्यांचा निषेध, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या, जनावरांसाठी चारा छावण्या उभारा किंवा चारा उपलब्ध करून द्या, नांदगाव तालुक्याला मांजरपाडा-१ मधून नारपारचे पाणी समन्यायी पद्धतीने द्या, शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करा, कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमीन कसणाºयांच्या नावे करा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, शेतमजूर, कामगार यांना गावपातळीवरती रोजगार हमीतून कामे उपलब्ध करू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकरी आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, ३५३ कलमचा गैरवापर थांबवा खोट्या केसेस मागे घ्या, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन दरमहा सात हजार देण्याचा कायदा करा यांसह इतर मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांना सादर करण्यात आले. विजय दराडे, देवचंद सुरसे, शांताराम पवार, जयराम बोरसे, कोंडीराम माळी, निंबा आहेर, प्रकाश भावसार, रामदास जाधव, श्रवण पवार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ज्येष्ठ दिवंगत कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल तसेच मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्यासह आत्महत्या केलेल्या शेतकºयांना भाकप किसान सभेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.