शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कष्टकरी शेतमजुरांचा नांदगावला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:30 IST

नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली.

ठळक मुद्देभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुक्याची अवस्था काळजी करावी अशी असून, तालुक्याच्या ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर शाळेत पदे रिक्त असल्याने शिकवायला शिक्षक नाही, वनजमिनींच्या तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या अनेक दाव्यांपैकी बहुतांशी दाव्यांचा निर्णय होऊ न शकल्याने ते प्रलंबित आहेत. ते निकाली काढावेत तसेच राज्यघटना संविधान प्रत दिल्ली येथे जाळणाऱ्यांचा निषेध, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या, जनावरांसाठी चारा छावण्या उभारा किंवा चारा उपलब्ध करून द्या, नांदगाव तालुक्याला मांजरपाडा-१ मधून नारपारचे पाणी समन्यायी पद्धतीने द्या, शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करा, कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमीन कसणाºयांच्या नावे करा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, शेतमजूर, कामगार यांना गावपातळीवरती रोजगार हमीतून कामे उपलब्ध करू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकरी आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, ३५३ कलमचा गैरवापर थांबवा खोट्या केसेस मागे घ्या, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन दरमहा सात हजार देण्याचा कायदा करा यांसह इतर मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांना सादर करण्यात आले. विजय दराडे, देवचंद सुरसे, शांताराम पवार, जयराम बोरसे, कोंडीराम माळी, निंबा आहेर, प्रकाश भावसार, रामदास जाधव, श्रवण पवार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ज्येष्ठ दिवंगत कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल तसेच मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्यासह आत्महत्या केलेल्या शेतकºयांना भाकप किसान सभेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.