शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकाच्या दहशतीत परीक्षा केंद्र

By admin | Updated: March 15, 2016 00:35 IST

जळगाव : दहावी, बारावी परीक्षेदरम्यान भरारी पथकांकडून संबंधित केंद्रांवर त्रास देणे, पैशांची मागणी करण्याचे प्रकार होत असल्याने पथकांची दहशत केंद्रप्रमुख व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या बाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठल्याच प्रकारची तक्रार दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जळगाव : दहावी, बारावी परीक्षेदरम्यान भरारी पथकांकडून संबंधित केंद्रांवर त्रास देणे, पैशांची मागणी करण्याचे प्रकार होत असल्याने पथकांची दहशत केंद्रप्रमुख व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या बाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठल्याच प्रकारची तक्रार दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी परीक्षा मंडळाकडून स्थानिकस्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी निरंतर, महिला पथक, डाएट प्राचार्य पथक, उपशिक्षणाधिकारी, राज्य मंडळ सदस्य पथक या ७ पथकांसह जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व गट शिक्षणाधिकारी अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
परीक्षा काळात एका भरारी पथकाला एकाच मार्गावरील शक्य होईल तितक्या केंद्रांना भेटी देण्यासंबंधात सूचना आहे. मात्र तीन तासांच्या परीक्षे दरम्यान साधारण तीन केंद्रांवर भेटी शक्य होतात. एखाद्या केंद्रावर गोंधळ किंवा संशयास्पद परिस्थिती आढळल्यास अशा केंद्रांवर पथकांकडून अधिकवेळ दिला जातो यामुळे दोन-तीन केंद्रांवरच भेटी देणे शक्य होते. केंद्रांच्या स्तितीवर पथकाची वेळ ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान काही पथकांकडून केंद्रांवर भेटी दरम्यान संशयास्पद परिस्थिती असल्यास संबंधितांकडे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी केंद्रप्रमुख व शिक्षकांच्या आहेत. मात्र याबाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठलीच तक्रार नसल्याची माहिती आहे.
परीक्षा केंद्रांवरील गोंधळ कमी करण्यासाठी गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या अंतर्गत तालुक्यातील सर्वच केंद्रांवर तीन सदस्यांचे (त्यात एक महिला सदस्य) बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकांना तीन तास संबंधित केंद्रावर थांबून रहाणे बंधनकारक आहे. मात्र तसे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भरारी पथकांकडून विद्यार्थ्यांवर करवाई होत आहे. तसेच जिल्‘ातील १६ उपद्रवी केंद्रांवरील पथकांनी संपूर्ण वेळे केंद्रावरच देने बंधनकारक आहे.

पथकांकडून पैशानी मागणीबाबत आपल्याकडे अद्याप कुठलीच तक्रार आलेली नाही. संबंधितांनी लेखी तक्रारी दिल्यास पथकांवर कारवाई करण्यात येईल.
-डी.एम. महाजन
शिक्षणाधिकारी (माध्यमिक).