शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

भरारी पथकाच्या दहशतीत परीक्षा केंद्र

By admin | Updated: March 15, 2016 00:35 IST

जळगाव : दहावी, बारावी परीक्षेदरम्यान भरारी पथकांकडून संबंधित केंद्रांवर त्रास देणे, पैशांची मागणी करण्याचे प्रकार होत असल्याने पथकांची दहशत केंद्रप्रमुख व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या बाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठल्याच प्रकारची तक्रार दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जळगाव : दहावी, बारावी परीक्षेदरम्यान भरारी पथकांकडून संबंधित केंद्रांवर त्रास देणे, पैशांची मागणी करण्याचे प्रकार होत असल्याने पथकांची दहशत केंद्रप्रमुख व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या बाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठल्याच प्रकारची तक्रार दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी परीक्षा मंडळाकडून स्थानिकस्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी निरंतर, महिला पथक, डाएट प्राचार्य पथक, उपशिक्षणाधिकारी, राज्य मंडळ सदस्य पथक या ७ पथकांसह जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व गट शिक्षणाधिकारी अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
परीक्षा काळात एका भरारी पथकाला एकाच मार्गावरील शक्य होईल तितक्या केंद्रांना भेटी देण्यासंबंधात सूचना आहे. मात्र तीन तासांच्या परीक्षे दरम्यान साधारण तीन केंद्रांवर भेटी शक्य होतात. एखाद्या केंद्रावर गोंधळ किंवा संशयास्पद परिस्थिती आढळल्यास अशा केंद्रांवर पथकांकडून अधिकवेळ दिला जातो यामुळे दोन-तीन केंद्रांवरच भेटी देणे शक्य होते. केंद्रांच्या स्तितीवर पथकाची वेळ ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान काही पथकांकडून केंद्रांवर भेटी दरम्यान संशयास्पद परिस्थिती असल्यास संबंधितांकडे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी केंद्रप्रमुख व शिक्षकांच्या आहेत. मात्र याबाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठलीच तक्रार नसल्याची माहिती आहे.
परीक्षा केंद्रांवरील गोंधळ कमी करण्यासाठी गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या अंतर्गत तालुक्यातील सर्वच केंद्रांवर तीन सदस्यांचे (त्यात एक महिला सदस्य) बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकांना तीन तास संबंधित केंद्रावर थांबून रहाणे बंधनकारक आहे. मात्र तसे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भरारी पथकांकडून विद्यार्थ्यांवर करवाई होत आहे. तसेच जिल्‘ातील १६ उपद्रवी केंद्रांवरील पथकांनी संपूर्ण वेळे केंद्रावरच देने बंधनकारक आहे.

पथकांकडून पैशानी मागणीबाबत आपल्याकडे अद्याप कुठलीच तक्रार आलेली नाही. संबंधितांनी लेखी तक्रारी दिल्यास पथकांवर कारवाई करण्यात येईल.
-डी.एम. महाजन
शिक्षणाधिकारी (माध्यमिक).