शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळा वाढल्या; पात्र शिक्षक कुठे आहेत?

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

गुणवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षण

गुणवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षण
पुणे : एकीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढत चालली आहे. तसेच उर्दू शाळांबाबत नवीन धोरण आखण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. मात्र, या शाळांमध्ये शिकविण्यासाठी पात्र शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील काळात अपात्र शिक्षकांकडून इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळा चालवाव्या लागणार आहेत. परिणामी या शिक्षकांकडून गुणवत्ताधारक विद्यार्थी निर्माण होतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने २०१० मध्ये डीएड् उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी घेतली. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना राज्यातील विविध जिल्‘ात शिक्षक सेवकपदी काम करण्यासाठी नियुक्त केले. त्यातील सुमारे १०० उमेदवार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पाच वर्षांपासून शासनाने शिक्षक सेवक भरती केलेली नाही. त्यामुळे २०१० पासून ते २०१४ या कालावधीत ३ लाख १६ हजार ८९७ उमेदवार डीएड् परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड माध्यमाच्या उमेदवारांचा समावेश आहे. २०१० पूर्वी डीएड् उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरी न मिळालेल्या उमेदवारांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. मात्र, राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणारे उमेदवारच शिक्षक पदासाठी पात्र ठरतील, असे धोरण जाहीर केले. त्यानुसार दोन टीईटी परीक्षा घेतल्या. यामध्ये उत्तीर्ण होणार्‍या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या बरी असली तरी इंग्रजी व उर्दू माध्यमातील उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे.
चार वर्षात इंग्रजी माध्यमातून डीएड उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७४९ आहे. मात्र, दोन परीक्षांमध्ये इंग्रजी माध्यमातून टीईटी पेपर एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १११ आहे. तर टीईटी पेपर दोन मधून ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याच प्रमाणे उर्दू माध्यमाच्या परीक्षेतून पेपर एक मधून १८८ तर पेपर दोन मधून १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकपदी काम करण्यासाठी सध्या केवळ एवढेच उमेदवार पात्र आहेत. मराठी माध्यमाच्या परीक्षेत सुमारे ३० हजार उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
------------------------