शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

इंग्रजी शाळा वाढल्या; पात्र शिक्षक कुठे आहेत?

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

गुणवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षण

गुणवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षण
पुणे : एकीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढत चालली आहे. तसेच उर्दू शाळांबाबत नवीन धोरण आखण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. मात्र, या शाळांमध्ये शिकविण्यासाठी पात्र शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील काळात अपात्र शिक्षकांकडून इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळा चालवाव्या लागणार आहेत. परिणामी या शिक्षकांकडून गुणवत्ताधारक विद्यार्थी निर्माण होतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने २०१० मध्ये डीएड् उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी घेतली. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना राज्यातील विविध जिल्‘ात शिक्षक सेवकपदी काम करण्यासाठी नियुक्त केले. त्यातील सुमारे १०० उमेदवार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पाच वर्षांपासून शासनाने शिक्षक सेवक भरती केलेली नाही. त्यामुळे २०१० पासून ते २०१४ या कालावधीत ३ लाख १६ हजार ८९७ उमेदवार डीएड् परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड माध्यमाच्या उमेदवारांचा समावेश आहे. २०१० पूर्वी डीएड् उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरी न मिळालेल्या उमेदवारांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. मात्र, राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणारे उमेदवारच शिक्षक पदासाठी पात्र ठरतील, असे धोरण जाहीर केले. त्यानुसार दोन टीईटी परीक्षा घेतल्या. यामध्ये उत्तीर्ण होणार्‍या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या बरी असली तरी इंग्रजी व उर्दू माध्यमातील उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे.
चार वर्षात इंग्रजी माध्यमातून डीएड उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७४९ आहे. मात्र, दोन परीक्षांमध्ये इंग्रजी माध्यमातून टीईटी पेपर एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १११ आहे. तर टीईटी पेपर दोन मधून ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याच प्रमाणे उर्दू माध्यमाच्या परीक्षेतून पेपर एक मधून १८८ तर पेपर दोन मधून १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकपदी काम करण्यासाठी सध्या केवळ एवढेच उमेदवार पात्र आहेत. मराठी माध्यमाच्या परीक्षेत सुमारे ३० हजार उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
------------------------