शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

इंग्रजी शाळा वाढल्या; पात्र शिक्षक कुठे आहेत?

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

गुणवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षण

गुणवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षण
पुणे : एकीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढत चालली आहे. तसेच उर्दू शाळांबाबत नवीन धोरण आखण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. मात्र, या शाळांमध्ये शिकविण्यासाठी पात्र शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील काळात अपात्र शिक्षकांकडून इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळा चालवाव्या लागणार आहेत. परिणामी या शिक्षकांकडून गुणवत्ताधारक विद्यार्थी निर्माण होतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने २०१० मध्ये डीएड् उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी घेतली. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना राज्यातील विविध जिल्‘ात शिक्षक सेवकपदी काम करण्यासाठी नियुक्त केले. त्यातील सुमारे १०० उमेदवार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पाच वर्षांपासून शासनाने शिक्षक सेवक भरती केलेली नाही. त्यामुळे २०१० पासून ते २०१४ या कालावधीत ३ लाख १६ हजार ८९७ उमेदवार डीएड् परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड माध्यमाच्या उमेदवारांचा समावेश आहे. २०१० पूर्वी डीएड् उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरी न मिळालेल्या उमेदवारांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. मात्र, राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणारे उमेदवारच शिक्षक पदासाठी पात्र ठरतील, असे धोरण जाहीर केले. त्यानुसार दोन टीईटी परीक्षा घेतल्या. यामध्ये उत्तीर्ण होणार्‍या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या बरी असली तरी इंग्रजी व उर्दू माध्यमातील उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे.
चार वर्षात इंग्रजी माध्यमातून डीएड उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७४९ आहे. मात्र, दोन परीक्षांमध्ये इंग्रजी माध्यमातून टीईटी पेपर एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १११ आहे. तर टीईटी पेपर दोन मधून ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याच प्रमाणे उर्दू माध्यमाच्या परीक्षेतून पेपर एक मधून १८८ तर पेपर दोन मधून १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकपदी काम करण्यासाठी सध्या केवळ एवढेच उमेदवार पात्र आहेत. मराठी माध्यमाच्या परीक्षेत सुमारे ३० हजार उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
------------------------