शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अपयशाची भीती बाळगू नका- प्रांजल पाटील

By admin | Updated: May 11, 2016 00:23 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला.
तंत्रज्ञानाने बर्‍याच गोष्टी आता सोप्या झाल्या असून त्याचा फायदा घेत आणि अंध आहे हा न्यूनगंड न बाळगता मुक्त विचारसरणीने आणि हसत खेळत चिंतामुक्त अभ्यास करून आई-वडिलांच्या प्रेरणेने यश संपादन केले असल्याचे प्रांजल पाटील यांनी सांगितले.

प्रांजलच्या अंधत्वाने कुटुंबीय झाले दु:खमय
प्रांजल ‘ा दुसरीत असताना एका विद्यार्थ्यांने त्यांच्या डोळ्यावर पेन्सिल मारली होती. त्यातच त्यांचा एक डोळा अधू झाला होता. तसेच तिसरीत असताना चाळीसगाव येथे मामांच्या लग्नाला कुटुंबासमवेत गेले असता आजारी पडल्याने दुसरा डोळाही अधू झाला. अंधत्व दूर व्हावे यासाठी वडिलांंनी आशेपोटी मुंबई येथे एका नामांकित डॉक्टारांकडे शस्त्रक्रियादेखील केली, मात्र यश आले नाही. प्रांजल यांच्या जीवनात अंधत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. संपूर्ण कुटुंब दु:खमय झाले.

आई-वडिलांच्या प्रेरणेने शिक्षणात उंच भरारी
प्रांजलाच्या अंधत्वाने आई-वडिलांनी हार न मानता त्यांना धीर दिला. आणि शिक्षणासाठी पे्ररित केले. त्यांचे चौथी ते दहावी पर्यंतचे शिक्षण दादर येथील कमला मेहता अंध शाळेत झाले. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर उल्हासनगरातील सि.एच.एम. महाविद्यालयात १२ वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करुन कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर सेंट झेव्हीअर्स महाविद्यालयातून २००८ मध्ये पदवी प्राप्त करीत विद्यापीठातूनही प्रथम क्रमांम पटकाविला. यशामागे मिळणार्‍या यशामुळे प्रांजल पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आणि वडिलांकडे आय.ए.एस. होण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनीही त्यांच्या इच्छेला प्रतिसाद दिला आणि दिल्ली येथील जेएनयु विद्यापीठात एम.ए.साठीच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा दिली. त्यातही त्यांची निवड झाली आणि पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी एम.ए., एम.फिल. करीत आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधावर पीएच.डी. करीत आहेत. शिक्षण करीत असतानाच आय.ए.एस. होण्याची इच्छा उराशी होतीच.