शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

अपयशाची भीती बाळगू नका- प्रांजल पाटील

By admin | Updated: May 11, 2016 00:23 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला.
तंत्रज्ञानाने बर्‍याच गोष्टी आता सोप्या झाल्या असून त्याचा फायदा घेत आणि अंध आहे हा न्यूनगंड न बाळगता मुक्त विचारसरणीने आणि हसत खेळत चिंतामुक्त अभ्यास करून आई-वडिलांच्या प्रेरणेने यश संपादन केले असल्याचे प्रांजल पाटील यांनी सांगितले.

प्रांजलच्या अंधत्वाने कुटुंबीय झाले दु:खमय
प्रांजल ‘ा दुसरीत असताना एका विद्यार्थ्यांने त्यांच्या डोळ्यावर पेन्सिल मारली होती. त्यातच त्यांचा एक डोळा अधू झाला होता. तसेच तिसरीत असताना चाळीसगाव येथे मामांच्या लग्नाला कुटुंबासमवेत गेले असता आजारी पडल्याने दुसरा डोळाही अधू झाला. अंधत्व दूर व्हावे यासाठी वडिलांंनी आशेपोटी मुंबई येथे एका नामांकित डॉक्टारांकडे शस्त्रक्रियादेखील केली, मात्र यश आले नाही. प्रांजल यांच्या जीवनात अंधत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. संपूर्ण कुटुंब दु:खमय झाले.

आई-वडिलांच्या प्रेरणेने शिक्षणात उंच भरारी
प्रांजलाच्या अंधत्वाने आई-वडिलांनी हार न मानता त्यांना धीर दिला. आणि शिक्षणासाठी पे्ररित केले. त्यांचे चौथी ते दहावी पर्यंतचे शिक्षण दादर येथील कमला मेहता अंध शाळेत झाले. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर उल्हासनगरातील सि.एच.एम. महाविद्यालयात १२ वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करुन कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर सेंट झेव्हीअर्स महाविद्यालयातून २००८ मध्ये पदवी प्राप्त करीत विद्यापीठातूनही प्रथम क्रमांम पटकाविला. यशामागे मिळणार्‍या यशामुळे प्रांजल पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आणि वडिलांकडे आय.ए.एस. होण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनीही त्यांच्या इच्छेला प्रतिसाद दिला आणि दिल्ली येथील जेएनयु विद्यापीठात एम.ए.साठीच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा दिली. त्यातही त्यांची निवड झाली आणि पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी एम.ए., एम.फिल. करीत आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधावर पीएच.डी. करीत आहेत. शिक्षण करीत असतानाच आय.ए.एस. होण्याची इच्छा उराशी होतीच.