शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

अपयशाची भीती बाळगू नका- प्रांजल पाटील

By admin | Updated: May 11, 2016 00:23 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला.
तंत्रज्ञानाने बर्‍याच गोष्टी आता सोप्या झाल्या असून त्याचा फायदा घेत आणि अंध आहे हा न्यूनगंड न बाळगता मुक्त विचारसरणीने आणि हसत खेळत चिंतामुक्त अभ्यास करून आई-वडिलांच्या प्रेरणेने यश संपादन केले असल्याचे प्रांजल पाटील यांनी सांगितले.

प्रांजलच्या अंधत्वाने कुटुंबीय झाले दु:खमय
प्रांजल ‘ा दुसरीत असताना एका विद्यार्थ्यांने त्यांच्या डोळ्यावर पेन्सिल मारली होती. त्यातच त्यांचा एक डोळा अधू झाला होता. तसेच तिसरीत असताना चाळीसगाव येथे मामांच्या लग्नाला कुटुंबासमवेत गेले असता आजारी पडल्याने दुसरा डोळाही अधू झाला. अंधत्व दूर व्हावे यासाठी वडिलांंनी आशेपोटी मुंबई येथे एका नामांकित डॉक्टारांकडे शस्त्रक्रियादेखील केली, मात्र यश आले नाही. प्रांजल यांच्या जीवनात अंधत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. संपूर्ण कुटुंब दु:खमय झाले.

आई-वडिलांच्या प्रेरणेने शिक्षणात उंच भरारी
प्रांजलाच्या अंधत्वाने आई-वडिलांनी हार न मानता त्यांना धीर दिला. आणि शिक्षणासाठी पे्ररित केले. त्यांचे चौथी ते दहावी पर्यंतचे शिक्षण दादर येथील कमला मेहता अंध शाळेत झाले. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर उल्हासनगरातील सि.एच.एम. महाविद्यालयात १२ वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करुन कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर सेंट झेव्हीअर्स महाविद्यालयातून २००८ मध्ये पदवी प्राप्त करीत विद्यापीठातूनही प्रथम क्रमांम पटकाविला. यशामागे मिळणार्‍या यशामुळे प्रांजल पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आणि वडिलांकडे आय.ए.एस. होण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनीही त्यांच्या इच्छेला प्रतिसाद दिला आणि दिल्ली येथील जेएनयु विद्यापीठात एम.ए.साठीच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा दिली. त्यातही त्यांची निवड झाली आणि पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी एम.ए., एम.फिल. करीत आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधावर पीएच.डी. करीत आहेत. शिक्षण करीत असतानाच आय.ए.एस. होण्याची इच्छा उराशी होतीच.