शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भन्नाट दोस्तांचा कॅम्पस कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:09 IST

सगळे वेगवेगळे पण दोस्तीनं मात्र त्यांना एकत्र आणलं.

ठळक मुद्देकॉलेजचं शेवटचं वर्षे, यापुढे सोबत असतील फक्त आठवणी

नुपूर जालेवार

आमचा कट्टा सगळ्यात आगळावेगळा आहे. तसा तो प्रत्येकालाच वाटतो आपापला. तसा तो आम्हाला पण वाटतो. कोणतीच गोष्ट सारखी नाही आमच्यात. कोणी अभ्यासात हुशार आहे , आपल्या  डिपार्टमेण्टमध्ये टॉपर आहे. कुणी जेमतेम. कुणी जाड, तर कुणाला मेकअपवरुन चिडवलं जातं. कोणी खुपच शांत म्हणून त्याला सायलेण्ट मोड  म्हणतो तर कोणाची इतकी बडबड कि तोंडाला चिकटपट्टी लावता आली असती तर बर झालं असतं असं वाटतं.कॉलेजच्या सगळ्या पार्टी  करण्यात आम्ही सगळे एकत्न असतो . अन्युअल फंक्शन ची धम्माल तर वेगळीच. तसंच आम्ही विविध  उपक्र मात पण सहभागी होतो. दौलताबादला कॉलेजतर्फे वृक्षारोपण केला आहे तिथे झाडांना पाणी देण्याचा उपक्रम मस्त झाला होता.  पहिल्यांदा सगळे फिरायला लेणीला गेलो होतो तेव्हा खूप मोठं भांडण झालं होतं वाटलं कि संपला ग्रुप पण परत दुसर्‍या दिवशी कॅम्पस मध्ये भेटलो तर सगळं पहिल्यासारखं होतं. कोणी जर कधी रडत असेल तर हसवणारे आम्ही कधी कधी सगळे एकासाठी रडत असतो.  दुसर्‍यांदा  आम्ही फिरायला गेलो तेव्हा आमच्यातल्या तिघींचा अपघात  झाला. त्यात मी ही होते. ज्याप्रकारे सगळ्यांनी सांभाळून घेतल्ं  त्याने तर आमची मैत्नी अजूनच घट्ट झाली .खरंतर कॅम्पसनेच आमचा ग्रुप तयार केला कारण सुरु वातीला सगळे दूर होते. आम्ही कोणी एका वर्गातले नाही . सगळ्यांचे विषय वेगळे आहेत . तरी पण आम्ही एकत्र  आलो .एखाद्या लेर नंतर रिकामा क्लासरूम शोधून तिथे गप्पा मारत बसणं नाहीतर गेम खेळणं.  कॉलेज कॅन्टीन मध्ये घरचे डबे भांडून खाण्याची मजाच भारी.  दुसरी कोणती वाईट सवय नसली तरी चहाची आहे हे तर कॅन्टीनच्या मावशीना पण चांगलं समजलं आहे . कोणाला पण सरळ नावाने हाक मारतच नाही त्यात गावरान तडका असतो आपुलकीचा. कोण काय विचार करतो आमच्याबद्दल त्याने आम्हाला फरक पडत नाही. आता हे आमच शेवटचं वर्ष आहे . म्हणून एकेक दिवस भरभरुन जगत आठवणी जमा करतो आहोत.