शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

शांती आणि विकासाचे नवे युग; उत्तर बस्तर आणि अबूझमाड नक्षलमुक्त- मुख्यमंत्री विष्णुदेव साय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षल निर्मूलन मोहीम ऐतिहासिक यशाकडे वाटचाल करत आहे.

रायपूर-छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी म्हटले की, उत्तर बस्तर आणि अबूझमाडचा नक्षलमुक्त प्रदेश बनणे हे सिद्ध करते की, आता बस्तर भयाचे नव्हे, तर विश्वास आणि विकासाचे प्रतीक बनले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत आज नक्षलवादाच्या अंताच्या उंबरठ्यावर उभा आहे.

दोन दिवसांत २५८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

मुख्यमंत्री साय यांनी पुढे सांगितले की, मागील दोन दिवसांत २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, हे बंदुकीच्या नव्हे तर विश्वासाच्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यांच्या मते, गेल्या २२ महिन्यांत ४७७ नक्षलवादी ठार, २११० आत्मसमर्पण आणि १७८५ अटक या आकडेवारीमुळे छत्तीसगड सरकारचा नक्षलमुक्त राज्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगड नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण छत्तीसगड नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट आता अगदी जवळ आले आहे. हे परिवर्तन राज्य सरकारच्या “नक्सलवादी आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण २०२५” तसेच “नियद नेल्ला नार योजने”च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे.

डबल इंजिन सरकारच्या संवेदनशील धोरणांमुळे, बस्तरमध्ये वाढणाऱ्या सुरक्षा छावण्यांमुळे आणि शासनावरील विश्वासामुळे हा बदल घडला आहे. आतापर्यंत नक्षलप्रभावित भागांत ६४ नवीन सुरक्षा कॅम्प उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे सुरक्षा तसेच विकासाची किरणे गावागावात पोहोचत आहेत.

वीर जवानांच्या शौर्याला मुख्यमंत्रींचा सलाम

मुख्यमंत्री साय यांनी सुरक्षाबलांच्या अदम्य धैर्य आणि बलिदानाला नमन करत म्हटले की त्यांच्या समर्पणामुळेच आज बस्तर भयमुक्त झाला असून शांततेच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यांनी सांगितले की, अबूझमाड आणि उत्तर बस्तर पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहेत, तर दक्षिण बस्तरात निर्णायक लढाई सुरू आहे. “नियद नेल्ला नार” सारख्या योजनांनी बस्तरात संवाद, विकास आणि संवेदनशीलतेची नवी पायवाट घातली आहे.

सरकारचा स्पष्ट संदेश 

मुख्यमंत्री साय यांनी स्पष्ट केले की, सरकारची धोरणे अगदी स्पष्ट आहेत, हिंसेला कोणतीही जागा नाही. जे नक्षलवादी शांती आणि विकासाचा मार्ग स्वीकारतील त्यांचे स्वागत आहे; पण जे बंदूक उचलून समाजात भय निर्माण करतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन करत म्हटले की, “हिंसेचा मार्ग अंतहीन वेदना देतो; पण आत्मसमर्पण जीवनाला नवी दिशा आणि नव्या सुरुवातीची संधी देतो. आपल्या मातृभूमीच्या भविष्याकरिता आणि आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शस्त्रे खाली ठेवा आणि विकासाच्या प्रकाशात या.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट करून सांगितले की, छत्तीसगडमधील अबूझमाड आणि उत्तर बस्तर, जे कधी नक्षल दहशतीचे गढ होते,  आता पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित झाले आहेत. हा केवळ भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा विजय नाही, तर विकास, विश्वास आणि संवेदनेची नवी कहाणी आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, हे त्याचे मोठे उदाहरण आहे. त्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांचे स्वागत करत त्यांना देशाच्या एकतेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhattisgarh: Naxal-Free Era Dawns in Bastar, Abujhmad; Development Focus

Web Summary : Chhattisgarh's Bastar and Abujhmad are now Naxal-free, signaling a shift towards development. Over 250 Naxals surrendered recently. The state aims to be completely Naxal-free by 2026, driven by effective policies and increased security presence, fostering trust and progress.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड