शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आणखी एक प्रताप! महाभागांनी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवले; कारण ऐकून संताप येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:11 IST

बादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात

रायपूर - कांकेर जिल्ह्यात अधिकाऱ्याने लाखो लीटर पाणी वाया घालवण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात धरणातील पाणी विनाकारण उपसा केल्याची घटना घडली आहे. वन्यजीव ज्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात तिथे काही महाभागांनी ताजे मासे पकडण्याच्या हेतूने लाखो लीटर पाणी वाया घालवले. 

वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जशपूर जिल्ह्यातील बगिचा विकास गटातील बादलखोल वन रिझर्व्हमध्ये गायलुंगा गावाजवळ लाखो लीटर पाण्यासाठी स्टॉप डॅम बांधण्यात आला होता, मात्र उपद्रवी लोकांनी गेट उघडून लाखो लिटर पाणी बर्बाद केले. या धरणात सुमारे ६ फुटांपर्यंत पाणी असून धरणातून पाणी ओसंडून वाहत होते. धरणात ३०० मीटर लांबीपर्यंत पाणी होते. या अभयारण्यात असणाऱ्या वन्य प्राण्यांबरोबरच आजूबाजूच्या गावातील गुरेही उन्हाळ्यात येथे पाणी पिण्यासाठी येत असत, मात्र आता धरणातून सर्व पाणी वाहून गेले आहे, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावांमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाण्याच्या शोधात हत्ती गावात घुसण्याची भीतीबादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात. हत्तींचा कळप येथे नेहमीच ये-जा करत असतो. अशा स्थितीत स्टॉप डॅममधून पाणी वाया गेल्याने आता त्या भागात पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी आता गावाकडे येऊ शकतात. बादलखोलच्या या जंगलात अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत, ज्यामध्ये हरीण, हिरणे, अस्वल, नीलगाय, वाघ अशा प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत.

मासेमारीसाठी पाणी घालवले वायापरिसरात राहणारे आदिवासी कधीच अशी कृत्ये करत नाहीत असे जाणकारांचे मत आहे. निश्‍चितच काही टवाळखोरांनी केलेले हे कृत्य आहे. कारण जंगलात राहणारा एक मोठा आदिवासी समूह उन्हाळ्यात पाण्यावर अवलंबून असतो आणि त्यांची मासेमारीची परंपरा म्हणजे बनशी खेळणे, जाळे टाकणे अशी आहे.  पाणी वाया घालवणे, वाहत्या पाण्यातून मासेमारी न करणे हे ते करणार नाहीत असं स्थानिकांनी सांगितले.