शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक प्रताप! महाभागांनी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवले; कारण ऐकून संताप येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:11 IST

बादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात

रायपूर - कांकेर जिल्ह्यात अधिकाऱ्याने लाखो लीटर पाणी वाया घालवण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात धरणातील पाणी विनाकारण उपसा केल्याची घटना घडली आहे. वन्यजीव ज्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात तिथे काही महाभागांनी ताजे मासे पकडण्याच्या हेतूने लाखो लीटर पाणी वाया घालवले. 

वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जशपूर जिल्ह्यातील बगिचा विकास गटातील बादलखोल वन रिझर्व्हमध्ये गायलुंगा गावाजवळ लाखो लीटर पाण्यासाठी स्टॉप डॅम बांधण्यात आला होता, मात्र उपद्रवी लोकांनी गेट उघडून लाखो लिटर पाणी बर्बाद केले. या धरणात सुमारे ६ फुटांपर्यंत पाणी असून धरणातून पाणी ओसंडून वाहत होते. धरणात ३०० मीटर लांबीपर्यंत पाणी होते. या अभयारण्यात असणाऱ्या वन्य प्राण्यांबरोबरच आजूबाजूच्या गावातील गुरेही उन्हाळ्यात येथे पाणी पिण्यासाठी येत असत, मात्र आता धरणातून सर्व पाणी वाहून गेले आहे, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावांमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाण्याच्या शोधात हत्ती गावात घुसण्याची भीतीबादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात. हत्तींचा कळप येथे नेहमीच ये-जा करत असतो. अशा स्थितीत स्टॉप डॅममधून पाणी वाया गेल्याने आता त्या भागात पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी आता गावाकडे येऊ शकतात. बादलखोलच्या या जंगलात अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत, ज्यामध्ये हरीण, हिरणे, अस्वल, नीलगाय, वाघ अशा प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत.

मासेमारीसाठी पाणी घालवले वायापरिसरात राहणारे आदिवासी कधीच अशी कृत्ये करत नाहीत असे जाणकारांचे मत आहे. निश्‍चितच काही टवाळखोरांनी केलेले हे कृत्य आहे. कारण जंगलात राहणारा एक मोठा आदिवासी समूह उन्हाळ्यात पाण्यावर अवलंबून असतो आणि त्यांची मासेमारीची परंपरा म्हणजे बनशी खेळणे, जाळे टाकणे अशी आहे.  पाणी वाया घालवणे, वाहत्या पाण्यातून मासेमारी न करणे हे ते करणार नाहीत असं स्थानिकांनी सांगितले.