शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

नक्षलग्रस्त अबूझमाडच्या कुतुलपर्यंत पोहोचली बस सेवा; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 14:24 IST

ग्रामस्थांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले

रायपूर: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त अबूझमाड प्रदेशात विकासयोजना गती घेताना पाहायला मिळत आहेत. नियद नेल्ला नार या योजनेअंतर्गत नारायणपूर जिल्ह्याच्या अंतर्गत भागात १४ नवीन पोलिस छावण्या स्थापन केल्यानंतर, या परिसरात आता रस्ते, पूल आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीचा झपाट्याने विस्तार होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १३ मे २०२५ रोजी पहिल्यांदाच नारायणपूर ते कुतुल गावासाठी थेट बस सेवा सुरू केली. ही बस सेवा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४९ किमी अंतरावर असलेल्या कुतुल गावासह कुरुषनार, बसिंग, कुंदला, कोहकामेटा, ईरकभट्टी, कच्चपाल आणि कोडलियार यासारख्या दुर्गम गावांना जोडत आहे. बस सेवा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष जल्लोष आणि आनंदाचे वातावरण आहे.

याआधी या गावातील लोकांना पायी प्रवास करावा लागत असे. पावसाळ्यात नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असल्याने रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेणे खूप कठीण होते. अनेकदा गावकऱ्यांना आजारी व्यक्तीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात जावे लागत असे. परंतु, आता बससेवा सुरू झाल्यामुळे वाहतूक सुलभ झाली असून, ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामांसाठी वेळेवर नारायणपूरला पोहोचण्याची सुविधा मिळाली आहे. 

नारायणपूर ते मसपूर या १४ गावांसाठी बस सेवा सुरू

नारायणपूर ते मसपूर या १४ गावांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे सदर भागातील लोकांना जिल्हा मुख्यालयाशी जोडता आले आहे. या योजनेअंतर्गत ४जी मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहेत. कस्तुरमेटा, मसपूर, ईरकभट्टी, मोहन्दी, होरादी, गारपा आणि कच्चापाल या गावांमधील लोक आता मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात. यामुळे केवळ दळणवळण व्यवस्थाच सुधारली नाही तर शैक्षणिक, आरोग्य आणि प्रशासकीय सेवांमध्येही सुधारणा झाली आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आणि सांगितले की, अनेक वर्षांनंतर त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळत आहे. नियद नेल्ला नार या योजनेने त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश आणला आहे.

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी