शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

‘झेडपी’चा शेतकरीकेंद्रीत अर्थसंकल्प !

By admin | Updated: March 22, 2016 01:17 IST

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आजवर शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना धीर मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेकडूनही पाऊले उचलण्यात आली आहेत. सोमवारी मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट तरतूद कण्यात आली आहे. १६ कोटी ९३ लाख ८ हजार ६३० रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आगामी आर्थिक वर्षामध्ये तब्बल २० नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णयही झाला.विशेष सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सभापती दत्तत्रय मोहिते, बाबुराव राठोड, हरिष डावरे, लता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बांधकाम तथा अर्थ समितीचे सभापती दत्तात्रय मोहिते यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. जिल्हा परिषदेला २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये १० कोटी ६९ लाख ३३ हजार ३३६ रूपये एवढे महसुली उत्पन्न अपेक्षित आहे. आणि पूर्वीची शिल्लक सुमारे १८ कोटी ९१ लाख ५४ हजार रूपये (जिल्हा बँकेत अडकलेले दहा कोटी व गाळे भाड्याच्या स्वरूपात प्राप्त होणारे २ कोटी ३३ लाख) इतकी आहे. त्यामुळे आरंभीच्या शिल्लकीसह २९ कोटी ६० लाख ७८ हजार ७०१ रूपये एवढी रक्कम जिल्हा परिषदेकडे उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून समाजकल्याण विभागासाठी २० टक्के, अपंगांच्या कल्याणासाठी ३ टक्के, महिला व बालकल्याण विभागासाठी १० टक्के, पाणी निधीसाठी २० टक्के तरतूद अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार सभागृहाने १४ कोटी २१ लाख ४९ हजार ५३० रूपये महसूली आणि २ कोटी ७१ लाख ५९ हजार १०० रूपये भांडवली खर्च व १५ कोटी ३९ लाख २९ हजार १७१ रूपये शिल्लक रक्कमेच्या मूळ अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट््या मजबूत करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुनेत तरतूदही दुप्पटीने वाढविली आहे. मागील अर्थसंकल्पामध्ये अवघ्या ७४ लाखांची तरतूद केली होती. यंदा ती १ कोटी ६३ लाख एवढी करण्यात आली. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच तब्बल २० नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. एकूणच यंदाचा अर्थसंकल्प शेतकरीकेंद्रित असल्याचे पहावयास मिळाले. यावेळी महेंद्र धुरगुडे यांनी इ-लर्निंगसह अन्य उपक्रमासाठीची तरतूद वाढविण्याची गरज व्यक्त केली. तसेच संजय पाटील दुधगावकर यांनी शेळ्या-मेंढ्यासाठीची योजना विस्तृत स्वरूपात राबविण्याची गरज व्यक्त करीत शासनाकडे ठराव पाठविण्याबाबत सूचना केली. रामदास कोळगे यांनी रस्त्यांसाठी वाढीव निधी देण्याबाबत सांगितले. कांचनमाला संगवे यांनी महिलांच्या सहलीचा पैसा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या उन्नतीसाठी उपयोगात आणावा, अशी सूचना केली. (प्रतिनिधी) सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न : पाटीलजिल्ह परिषदेचे उत्पन्न फारशे नाही. असे असतानाच जिल्हा बँकेतही तब्बल दहा कोटीपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुले उभारली जातील. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर अधिक भर दिला आहे. तरतूद दुप्पटीने वाढविली आहे. तसेच पहिल्यांदाच तब्बल वीस नावीन्यपूर्ण योजना हाती घेण्यात आल्या आहेत. एकूणच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी सांगितले.२०१६-१७ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीपूरक योजनांवर भर देण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तरतूद दुप्पट करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी शंभर टक्के शेळ्या वाटप केल्या जाणार आहेत. अपंगांची होणारी गैरसोय लक्षात घेवून आता जिल्हा परिषद इमारतीमध्ये लिफ्टची सोय करण्यात आली आहे. यासाठीही २० लाखांची तरतूद केली आहे. भविष्यात जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस पाऊले उचलली जातील, असे अर्थ समितीचे सभापती दत्तात्रय मोहिते यांनी सांगितले.