शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जि.प.त कामे लागली मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:22 IST

‘जीएसटी’ लागू होण्यापूर्वी मंजूर झालेली कामे पूर्वीच्या करप्रणालीनुसारच करण्यावर ठाम असलेल्या निविदाधारकांना जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने मोठा दिलासा दिला. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली ११ कोटी रुपयांची सुमारे ५० कामे मार्चपूर्वी मार्गी लागतील, तसेच वेळेत निधीही खर्च होईल, अशी अपेक्षा वित्त विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘जीएसटी’ लागू होण्यापूर्वी मंजूर झालेली कामे पूर्वीच्या करप्रणालीनुसारच करण्यावर ठाम असलेल्या निविदाधारकांना जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने मोठा दिलासा दिला. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली ११ कोटी रुपयांची सुमारे ५० कामे मार्चपूर्वी मार्गी लागतील, तसेच वेळेत निधीही खर्च होईल, अशी अपेक्षा वित्त विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली.जिल्हा परिषदेने जून महिन्यात सिंचन विभागाची ३५ कामे व बांधकाम विभागाच्या १५ कामांच्या निविदा मंजूर केल्या होत्या. यापैकी अनेक कंत्राटदारांना कामांच्या अंदाजित रकमेपेक्षा काहींना २० टक्के, १० टक्के ५ टक्के कमी दराने निविदा मंजूर झाल्या होत्या.कामांना कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच केंद्र सरकारने जुलैमध्ये ‘व्हॅट’ बंद करून ‘जीएसटी’ करप्रणाली लागू केली. नवीन कर प्रणालीमध्ये अंदाजित रकमेपेक्षा कमी दराने कामे करणे परवडत नसल्यामुळे निविदाधारकांनी ती करण्यास असमर्थता दाखवली होती. जवळपास सहा महिन्यांचा कालावधी झाला; पण एकही निविदाधारक काम करण्यास धजावत नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनासमोर पेच निर्माण झाला.या कामांच्या फेरनिविदा जाहीर केल्या, तर मार्चअखेरपर्यंत कामे होणार नाहीत. कोट्यवधी रुपयांचा निधी पुन्हा अखर्चित राहू शकतो, या विवंचनेत असलेल्या वित्त विभागाने कंत्राटदारांसोबत दराबाबत तडजोड करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी शहरातील काही मान्यवर चार्टर्ड अकाऊंटंटस्चा सल्ला घेण्यातआला.सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाच्या या कामांसाठी प्रशासनाने सरसकट २ टक्के किंवा यापेक्षा कमी दराने निविदाधारकांसोबत तडजोड केली व कार्यारंभ आदेश निर्गमित केले. वित्त विभागामार्फत या कामांची बिले अदा करताना २ टक्के रक्कम कपात केली जाणार आहे. ही कपात केलेली रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा केली जाणार आहे. पुढील सूचनानंतर ती रक्कम शासन किंवा कंत्राटदारांना दिली जाईल. कंत्राटदारांसोबत संवाद साधल्यानंतर मागील जन महिन्यापासून रखडलेली कामे आता मार्गी लागत आहेत. त्या सर्व कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेआहेत.