शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जि.प. शाळा सात दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:15 IST

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे.

चिंचोली लिंबाजी : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे. मात्र, तब्बल सात दिवसांपासून शाळा बंद असतानाही शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने शाळेला भेट देऊन तोडगा काढण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सध्या येथील शिक्षकांना चक्क शाळेबाहेरच आपले कर्तव्य बजवावे लागत आहे.रेऊळगाव शाळेवर इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत वर्ग असून, एकूण येथील विद्यार्थी संख्या २३७ आहे. या शाळेला शिक्षकांची ९ पदे मंजूर आहेत. मात्र, सात महिन्यांपासून २ सहशिक्षक, १ पदवीधर, तर मुख्याध्यापकाचे पदही रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांचे रिक्त पदे त्वरित भरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी, ग्रामशिक्षण समितीने गटशिक्षणधिकाºयांकडे वारंवार केली. मात्र, तरीही शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. अखेर २९ डिसेंबर रोजी ग्रा.पं. सदस्य संजय गोरे, देऊबा ढेपले यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेला दुसºयांदा कुलूप ठोकले होते. मात्र, तेव्हापासून एकाही अधिकाºयाने शाळेला भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सात दिवसांपासून शाळा बंद आहे. सध्या येथील शिक्षक चक्क शाळेबाहेर बसून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.पालकांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून सात महिन्यांपासून ग्रामस्थ व ग्राम शिक्षण समिती वारंवार शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाºयाला जाग आली नाही, त्यामुळे आम्ही दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू होऊन दीड महिना होत आला, तरी रिक्त जागा भरण्यात न आल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. मे २०१८ मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये येथे नियुक्त झालेल्या शिक्षकांनी वरिष्ठ अधिकाºयांची मर्जी सांभाळून काहींनी प्रतिनियुक्तीवर, तर काहींनी आपल्या सोयीनुसार शाळेतून काढता पाय घेतला. यामुळे येथे गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.——-ग्रामपंचयात सदस्य संजय गोरे म्हणाले, सात दिवसांपासून शाळा बंद असतानाही कन्नड शिक्षण विभागाचा एकही अधिकारी अद्याप या शाळेकडे फिरकलेला नाही. अधिकाºयांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहते. जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जि.प. सीईओ तसेच जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन त्वरित येथील वादावर तोडगा काढवा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा