शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळा सात दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:15 IST

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे.

चिंचोली लिंबाजी : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे. मात्र, तब्बल सात दिवसांपासून शाळा बंद असतानाही शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने शाळेला भेट देऊन तोडगा काढण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सध्या येथील शिक्षकांना चक्क शाळेबाहेरच आपले कर्तव्य बजवावे लागत आहे.रेऊळगाव शाळेवर इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत वर्ग असून, एकूण येथील विद्यार्थी संख्या २३७ आहे. या शाळेला शिक्षकांची ९ पदे मंजूर आहेत. मात्र, सात महिन्यांपासून २ सहशिक्षक, १ पदवीधर, तर मुख्याध्यापकाचे पदही रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांचे रिक्त पदे त्वरित भरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी, ग्रामशिक्षण समितीने गटशिक्षणधिकाºयांकडे वारंवार केली. मात्र, तरीही शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. अखेर २९ डिसेंबर रोजी ग्रा.पं. सदस्य संजय गोरे, देऊबा ढेपले यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेला दुसºयांदा कुलूप ठोकले होते. मात्र, तेव्हापासून एकाही अधिकाºयाने शाळेला भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सात दिवसांपासून शाळा बंद आहे. सध्या येथील शिक्षक चक्क शाळेबाहेर बसून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.पालकांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून सात महिन्यांपासून ग्रामस्थ व ग्राम शिक्षण समिती वारंवार शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाºयाला जाग आली नाही, त्यामुळे आम्ही दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू होऊन दीड महिना होत आला, तरी रिक्त जागा भरण्यात न आल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. मे २०१८ मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये येथे नियुक्त झालेल्या शिक्षकांनी वरिष्ठ अधिकाºयांची मर्जी सांभाळून काहींनी प्रतिनियुक्तीवर, तर काहींनी आपल्या सोयीनुसार शाळेतून काढता पाय घेतला. यामुळे येथे गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.——-ग्रामपंचयात सदस्य संजय गोरे म्हणाले, सात दिवसांपासून शाळा बंद असतानाही कन्नड शिक्षण विभागाचा एकही अधिकारी अद्याप या शाळेकडे फिरकलेला नाही. अधिकाºयांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहते. जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जि.प. सीईओ तसेच जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन त्वरित येथील वादावर तोडगा काढवा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा