शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

२१ सप्टेंबरलाच जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड

By admin | Updated: September 6, 2014 00:29 IST

परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले

परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले असून आता पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे २१ सप्टेंबर रोजी जि. प. अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी २० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी नवीन अध्यक्षांची व १४ सप्टेंबर रोजी पं. स. सभापती आणि उपसभापतींची निवड करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु, २ सप्टेंबर रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी या संदर्भातील प्रक्रिया तूर्त स्थगित ठेवून १४ व २१ सप्टेंबरच्या बैठकीसंदर्भातील नोटिसा वितरित करुनये, असे तोंडी आदेश जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशाला सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी महिंद्रकर यांनीही पुष्टी दिली. त्यानंतर लागलीच ४ सप्टेंबर रोजी शासनाने लेखी आदेश काढून पूर्वी ठरल्याप्रमाणे जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापतींची निवड करावी, असे सूचविले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १४ रोजी सकाळी १० वाजता ९ पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्याकरीता विशेष सभा घेण्यात येणार असून या सभेसाठी पीठासन अधिकारी ही नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २१ रोजी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी ११ वाजता विशेष सभा जि. प. सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांच्या निवडीसंदर्भातील संभ्रम आता दूर झाला आहे. (प्रतिनिधी)गोची होऊ नये म्हणून प्रक्रिया पूर्ववतकाही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कालावधी संपल्यानंतर राज्य शासनाने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात काही जण न्यायालयात गेल्याने राज्य शासनाची गोची झाली व हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे पूृर्व वेळापत्रकानुसार नगराध्यक्षांची निवड झाली. जि. प. अध्यक्षांनाही मुदतवाढ दिल्यास पुन्हा न्यायालयीन प्रश्न उपस्थित होऊ शकतो, ही बाब लक्षात आल्याने पूर्वी दिलेले तोंडी आदेश मागे घेऊन त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यात आली असल्याचे जाणकरांनी सांगितले.