शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२१ सप्टेंबरलाच जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड

By admin | Updated: September 6, 2014 00:29 IST

परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले

परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले असून आता पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे २१ सप्टेंबर रोजी जि. प. अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी २० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी नवीन अध्यक्षांची व १४ सप्टेंबर रोजी पं. स. सभापती आणि उपसभापतींची निवड करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु, २ सप्टेंबर रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी या संदर्भातील प्रक्रिया तूर्त स्थगित ठेवून १४ व २१ सप्टेंबरच्या बैठकीसंदर्भातील नोटिसा वितरित करुनये, असे तोंडी आदेश जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशाला सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी महिंद्रकर यांनीही पुष्टी दिली. त्यानंतर लागलीच ४ सप्टेंबर रोजी शासनाने लेखी आदेश काढून पूर्वी ठरल्याप्रमाणे जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापतींची निवड करावी, असे सूचविले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १४ रोजी सकाळी १० वाजता ९ पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्याकरीता विशेष सभा घेण्यात येणार असून या सभेसाठी पीठासन अधिकारी ही नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २१ रोजी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी ११ वाजता विशेष सभा जि. प. सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांच्या निवडीसंदर्भातील संभ्रम आता दूर झाला आहे. (प्रतिनिधी)गोची होऊ नये म्हणून प्रक्रिया पूर्ववतकाही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कालावधी संपल्यानंतर राज्य शासनाने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात काही जण न्यायालयात गेल्याने राज्य शासनाची गोची झाली व हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे पूृर्व वेळापत्रकानुसार नगराध्यक्षांची निवड झाली. जि. प. अध्यक्षांनाही मुदतवाढ दिल्यास पुन्हा न्यायालयीन प्रश्न उपस्थित होऊ शकतो, ही बाब लक्षात आल्याने पूर्वी दिलेले तोंडी आदेश मागे घेऊन त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यात आली असल्याचे जाणकरांनी सांगितले.