शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

२१ सप्टेंबरलाच जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड

By admin | Updated: September 6, 2014 00:29 IST

परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले

परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले असून आता पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे २१ सप्टेंबर रोजी जि. प. अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी २० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी नवीन अध्यक्षांची व १४ सप्टेंबर रोजी पं. स. सभापती आणि उपसभापतींची निवड करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु, २ सप्टेंबर रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी या संदर्भातील प्रक्रिया तूर्त स्थगित ठेवून १४ व २१ सप्टेंबरच्या बैठकीसंदर्भातील नोटिसा वितरित करुनये, असे तोंडी आदेश जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशाला सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी महिंद्रकर यांनीही पुष्टी दिली. त्यानंतर लागलीच ४ सप्टेंबर रोजी शासनाने लेखी आदेश काढून पूर्वी ठरल्याप्रमाणे जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापतींची निवड करावी, असे सूचविले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १४ रोजी सकाळी १० वाजता ९ पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्याकरीता विशेष सभा घेण्यात येणार असून या सभेसाठी पीठासन अधिकारी ही नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २१ रोजी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी ११ वाजता विशेष सभा जि. प. सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांच्या निवडीसंदर्भातील संभ्रम आता दूर झाला आहे. (प्रतिनिधी)गोची होऊ नये म्हणून प्रक्रिया पूर्ववतकाही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कालावधी संपल्यानंतर राज्य शासनाने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात काही जण न्यायालयात गेल्याने राज्य शासनाची गोची झाली व हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे पूृर्व वेळापत्रकानुसार नगराध्यक्षांची निवड झाली. जि. प. अध्यक्षांनाही मुदतवाढ दिल्यास पुन्हा न्यायालयीन प्रश्न उपस्थित होऊ शकतो, ही बाब लक्षात आल्याने पूर्वी दिलेले तोंडी आदेश मागे घेऊन त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यात आली असल्याचे जाणकरांनी सांगितले.