शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

जिल्हा परिषदेत आता कामांची लगबग वाढली

By admin | Updated: October 27, 2016 00:52 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन वर्षात होणे अपेक्षित असून, तीन ते चार महिन्यांत जेवढी कामे होतील, ती करून घेण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांची लगबग सुरू झाली आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन वर्षात होणे अपेक्षित असून, तीन ते चार महिन्यांत जेवढी कामे होतील, ती करून घेण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांची लगबग सुरू झाली आहे. ५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीसाठी सर्कलनिहाय सामाजिक आरक्षण, प्रवर्गनिहाय सोडत निघाल्यापासून सदस्यांची विभागात धावपळ वाढली आहे. विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी आलेल्या निधीतून सर्कलमध्ये विकासकामे करून घेतल्यास निवडणुकीत फायदा होईल. त्या अनुषंगाने पदाधिकारी आणि सदस्यांनी संचिकांचा पाठपुरावा सुरू केला आहे. बुधवारी जिल्हा परिषद आवारात सदस्य आणि त्यांच्याशी निगडितांनी विभागातील संचिका कुठे आहे. याचा आढावा घेण्यासाठी गर्दी केली होती. समाजकल्याण विभागाकडे आलेल्या निधीचे कशा प्रमाणात वाटप झाले आहे, याची माहिती अनेकांनी विभागात येऊन घेतली. तसेच बांधकाम विभागातही संचिकांसाठी गर्दी होती. येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या वाढली आहे. सोयगाव, फुलंब्री, सातारा-देवळाई हे गट कमी झाले तर पैठण, वैजापूर, औरंगाबाद, गंगापूर तालुक्यात गट वाढले. कन्नडमधील एक गट कमी झाला. सातारा-देवळाई हे गट मनपात विलीन झाल्यामुळे पंढरपूर आणि आडगाव या गटांमध्ये मनपा हद्दीबाहेरील गावे जोडली आहेत. वडगाव आणि वडगाव-कोल्हाटी हा गटदेखील नव्याने तयार झाला आहे. या रचनेनुसार विकासकामे करून घेण्यासाठी सदस्यांनी तयारी सुरू केली आहे.