शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

तुरीचा प्रश्न अजूनही रेंगाळलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:28 IST

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केलेल्या तुरीच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र ही तूर खरेदी अजूनही सुरू झाली नाही. मध्यंतरी भाववाढ झाल्याने शेतकºयांनी तूर बाजारात आणली होती. आता यातील किती शिल्लक असेल, हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केलेल्या तुरीच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र ही तूर खरेदी अजूनही सुरू झाली नाही. मध्यंतरी भाववाढ झाल्याने शेतकºयांनी तूर बाजारात आणली होती. आता यातील किती शिल्लक असेल, हा प्रश्नच आहे.शासनाच्या हमी भाव केंद्रावर तूर आणल्यानंतर शेतकºयांना मागील पूर्ण हंगामात वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. अनेक दिवस माल यार्डात पडून राहिला. त्यातच शासनाने ठराविक काळातच खरेदी केली. नंतर पुन्हा मुदतवाढीचा खेळ अनेक दिवस चालला. ३१ मेपर्यंत टोकन असलेल्या शेतकºयांची तूर ३१ जुलैपर्यंत खरेदी केली. मात्र नोंदणी केलेल्या मात्र टोकन न दिलेल्या शेतकºयांना या निर्णयाची अडचण झाली. त्यामुळे अशांची तूर घरातच पडून राहिली. त्यानंतर उर्वरित तुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतचा प्रस्तावही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शासनाकडे पाठवून खरेदीसाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांनी कृषी व पणन विभागाशी संपर्क साधल्यानंतर या सर्व शेतकºयांची तूर खरेदी होणार असल्याचे सांगितले होते. शेतकºयांनी खाजगी बाजारात तूर विकू नये, असे आवाहनही केले होते. मात्र मध्यंतरी पाच हजारांपर्यंत खाजगी व्यापारीच तूर खरेदी करू लागले होते. त्यामुळे अनेकांनी यात तुरीची विक्री केली. आता खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या काहीच हालचाली दिसत नाहीत. जे शेतकरी खरेच शासनाचे खरेदी केंद्र सुरू होईल, या आशेवर बसले आहेत त्यांची अडचण होवून बसली आहे. जिल्हाधिकाºयांनीच या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज असून जिल्हा उपनिबंधक कार्यालय अथवा बाजार समितीकडे याची माहितीच नाही.