शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महानगरपालिकेचे यंदाचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच

By admin | Updated: May 29, 2015 01:03 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दरवर्षी फुगत जाणाऱ्या बजेटवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यंदा पालिकेचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दरवर्षी फुगत जाणाऱ्या बजेटवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यंदा पालिकेचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परिणामी चालू आर्थिक वर्षाचे बजेट सहाशे कोटींच्या आतच राहणार असल्याचे लेखा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महानगरपालिकेकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी उत्पन्न आणि खर्चावर आधारित अंदाजपत्रक तयार केले जाते. परंतु गेल्या पाच- सात वर्षांपासून पालिकेतील सत्ताधारी जमा किंवा उत्पन्नाचा फारसा विचार न करता अवास्तव खर्चाचे बजेट तयार करीत आहेत. त्यामुळे बजेटचा आकार सातत्याने फुगत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या बजेटमध्ये वाढ करून ते ७९२ कोटी रुपयांचे केले. परंतु प्रत्यक्षात ४९२ कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळाले. मागील काही वर्षात अशाच पद्धतीने उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाचे बजेट बनविले गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकतेच पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्याविषयी विचारणा केली आहे. सरकारनेच बोट ठेवल्यामुळे आता पालिकेच्या लेखा विभागाने चालू वर्षासाठी आटोपशीर बजेट तयार करण्याची तयारी चालविली आहे. चालू वर्षासाठीचे बजेट बनविण्याचे काम सुरू झाले असून येत्या एक-दोन महिन्यांत ते सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाणार आहे. मनपा निवडणुकीमुळे प्रशासनाने याआधी एप्रिल ते जून या काळासाठी दोनशे कोटी रुपयांचे लेखानुदान मंजूर करून घेतले होते. आता उर्वरित काळासाठी बजेट सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाणार आहे. लेखानुदानासह हे बजेट एकूण सहाशे कोटींच्या आत राहील असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.