शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शिक्षकांना बदल्यांची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 23:44 IST

हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे

हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र यंदाही शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही, याबाबतच्या संदिग्धतेतच शिक्षण विभाग दिसत आहे.गतवर्षी संचमान्यता व शासन निर्णयाचा अन्वयार्थ काढल्याने शिक्षकांच्या बदल्यांची अडचण होऊन बसली होती. जि.प.च्या इतर विभागांच्या बदल्या झाल्या तरीही शिक्षण विभागाच्या मात्र बदल्या झाल्या नव्हत्या. यंदाही शिक्षण विभागाने पूर्ण शासन निर्णय न पाहताच बदल्यांसाठी सामान्य प्रशासनकडून मार्गदर्शन मागविण्याची तयारी चालविली होती. शासनाने बदल्यांबाबत पत्र पाठविल्याचे कळताच शिक्षकांत त्याबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे यंदा या प्रक्रियेबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्कंठा दिसत आहे. त्यासाठी बदल्यांसाठी इच्छुकांच्या जि.प.कडे फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु जि.प.त मात्र वेगळेच चित्र सुरू असल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. शिक्षण विभागाने तर टिपणी लिहून मार्गदर्शन मागविण्याची तयारीही केली होती. मात्र याबाबत सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याशी चर्चा केली असता २0१४ च्या शासन निर्णयात जिल्हा स्तरावर १0 टक्के बदल्यांचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सांगितले. सर्वच प्रकारात जवळपास हाच निकष आहे. तालुकास्तरावर मात्र त्यात बदल आहे. तालुका स्तरावर प्रशासकीय १0 टक्के तर विनंतीवरून ५ टक्के बदल्यांची तरतूद आहे. यंदा बदल्यांबाबत अजून प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याची माहिती मागविण्यास सांगण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आताच बदल्यांबाबत निश्चित काही सांगणे अवघडच दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पुन्हा अडचण : संचमान्यताच नाहीसंचमान्यता व समायोजन नसल्याने गेल्यावर्षी बदल्यांचे आदेश काढण्यात आले नव्हते. यंदाही अजून याबाबत कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. संचमान्यतेचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून केले जात आहे. परंतु त्याची काहीच काळजी न घेतल्याने काम ठप्पच असल्याचे दिसून येते.