शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

यंदा शिक्षकांना बदल्यांची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 23:44 IST

हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे

हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र यंदाही शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही, याबाबतच्या संदिग्धतेतच शिक्षण विभाग दिसत आहे.गतवर्षी संचमान्यता व शासन निर्णयाचा अन्वयार्थ काढल्याने शिक्षकांच्या बदल्यांची अडचण होऊन बसली होती. जि.प.च्या इतर विभागांच्या बदल्या झाल्या तरीही शिक्षण विभागाच्या मात्र बदल्या झाल्या नव्हत्या. यंदाही शिक्षण विभागाने पूर्ण शासन निर्णय न पाहताच बदल्यांसाठी सामान्य प्रशासनकडून मार्गदर्शन मागविण्याची तयारी चालविली होती. शासनाने बदल्यांबाबत पत्र पाठविल्याचे कळताच शिक्षकांत त्याबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे यंदा या प्रक्रियेबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्कंठा दिसत आहे. त्यासाठी बदल्यांसाठी इच्छुकांच्या जि.प.कडे फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु जि.प.त मात्र वेगळेच चित्र सुरू असल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. शिक्षण विभागाने तर टिपणी लिहून मार्गदर्शन मागविण्याची तयारीही केली होती. मात्र याबाबत सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याशी चर्चा केली असता २0१४ च्या शासन निर्णयात जिल्हा स्तरावर १0 टक्के बदल्यांचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सांगितले. सर्वच प्रकारात जवळपास हाच निकष आहे. तालुकास्तरावर मात्र त्यात बदल आहे. तालुका स्तरावर प्रशासकीय १0 टक्के तर विनंतीवरून ५ टक्के बदल्यांची तरतूद आहे. यंदा बदल्यांबाबत अजून प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याची माहिती मागविण्यास सांगण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आताच बदल्यांबाबत निश्चित काही सांगणे अवघडच दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पुन्हा अडचण : संचमान्यताच नाहीसंचमान्यता व समायोजन नसल्याने गेल्यावर्षी बदल्यांचे आदेश काढण्यात आले नव्हते. यंदाही अजून याबाबत कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. संचमान्यतेचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून केले जात आहे. परंतु त्याची काहीच काळजी न घेतल्याने काम ठप्पच असल्याचे दिसून येते.