शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

यंदा ४६ गावांत तंटामुक्ती मोहीम

By admin | Updated: May 29, 2014 00:24 IST

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत. आता उर्वरित ४६ ग्रामपंचायतींसाठी तंटामुक्ती मोहिम राबविली जाणार असून त्यासाठीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांना तंटामुक्त करण्यासाठी समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील ४९ पैकी ३९ गावे तंटामुक्त झाली असून १० गावे शिल्लक आहेत. बासंबा ठाणे हद्दीतील ४९ पैकी ४० गावे तंटामुक्त ठरली असून ९ गावे बाकी आहेत. नर्सी नामदेव ठाणे हद्दीतील २० पैकी १६ गावे, गोरेगाव ठाणे हद्दीतील ३७ पैकी ३२ गावे, सेनगाव ठाणे हद्दीतील ५९ पैकी ४८ गावे, कळमनुरी ठाणे हद्दीतील ६८ पैकी ६४ गावे, आखाडा बाळापूर ठाणे हद्दीतील ७६ पैकी ७६ गावे तंटामुक्त झाली आहेत. औंढा नागनाथ ठाणे हद्दीतील ५७ पैकी ५६ गावे, हट्टा ठाणे हद्दीतील५६ पैकी ५५ गावे, कुरूंदा ठाणे हद्दीतील ५४ पैकी ५४ गावे तंटामुक्त झाली आहेत. वसमत ठाणे हद्दीतील ४० पैकी ३९ गावे तंटामुक्तीच्या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. पुरस्कारासाठी शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील १० गावांचा समावेश आहे, अशी माहिती तंटामुक्ती समितीचे जिल्हा समन्वयक जमादार निजाम शेख यांनी दिली. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमुळे आलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यात या मोहिमेचे काम सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृती न झाल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. हळूहळू वाढत गेला लोकसहभाग.जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण हद्दीतील १० गावे आहेत.