शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

यंदा ४६ गावांत तंटामुक्ती मोहीम

By admin | Updated: May 29, 2014 00:24 IST

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत. आता उर्वरित ४६ ग्रामपंचायतींसाठी तंटामुक्ती मोहिम राबविली जाणार असून त्यासाठीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांना तंटामुक्त करण्यासाठी समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील ४९ पैकी ३९ गावे तंटामुक्त झाली असून १० गावे शिल्लक आहेत. बासंबा ठाणे हद्दीतील ४९ पैकी ४० गावे तंटामुक्त ठरली असून ९ गावे बाकी आहेत. नर्सी नामदेव ठाणे हद्दीतील २० पैकी १६ गावे, गोरेगाव ठाणे हद्दीतील ३७ पैकी ३२ गावे, सेनगाव ठाणे हद्दीतील ५९ पैकी ४८ गावे, कळमनुरी ठाणे हद्दीतील ६८ पैकी ६४ गावे, आखाडा बाळापूर ठाणे हद्दीतील ७६ पैकी ७६ गावे तंटामुक्त झाली आहेत. औंढा नागनाथ ठाणे हद्दीतील ५७ पैकी ५६ गावे, हट्टा ठाणे हद्दीतील५६ पैकी ५५ गावे, कुरूंदा ठाणे हद्दीतील ५४ पैकी ५४ गावे तंटामुक्त झाली आहेत. वसमत ठाणे हद्दीतील ४० पैकी ३९ गावे तंटामुक्तीच्या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. पुरस्कारासाठी शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील १० गावांचा समावेश आहे, अशी माहिती तंटामुक्ती समितीचे जिल्हा समन्वयक जमादार निजाम शेख यांनी दिली. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमुळे आलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यात या मोहिमेचे काम सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृती न झाल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. हळूहळू वाढत गेला लोकसहभाग.जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण हद्दीतील १० गावे आहेत.