शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

तु. शं. कुलकर्णी यांना जीवनगौरव

By admin | Updated: August 1, 2016 00:08 IST

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी परिषदेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी परिषदेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण ‘मसाप’च्या वर्धापन दिनी २९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे होईल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.‘मसाप’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बढे, के. एस. अतकरे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, देवीदास कुलकर्णी, डॉ.आसाराम लोमटे, देवीदास फुलारी, प्रा. सुरेश सावंत, रामचंद्र तिरुके, दगडू लोमटे, रसिका देशमुख, संजीवनी तडेगावकर, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ.रामचंद्र काळुंखे, विलास सिंदगीकर, संतोष तांबे आदी उपस्थित होते. प्रा. तु. शं. कुलकर्णी यांचे ‘तृणाची वेदना’,‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे कथा संग्रह प्रसिद्ध असून ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (१९६०-१९८०)’ या ग्रंथाचे त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादकपद तु. शं. कुलकर्णी यांनी भूषविले आहे. ‘मसाप’च्या कार्यवाहपदाची त्यांनी पंधरा वर्षे जबाबदारी पार पाडली.नामशेष होणाऱ्या शब्दांचा कोष‘मसाप’च्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात झालेल्या बैठकीत परिषदेच्या वाङ्मयीन उपक्रमाबाबत चर्चा झाली. मराठवाड्याच्या बोलीभाषेतील नामशेष होत जाणाऱ्या शब्दांचा कोष तयार करण्यासाठी या शब्दांचे संकलन व अभ्यासासाठी एक समिती डॉ.शेषराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.कौतिकराव ठाले यांचा अमृतमहोत्सव सोहळा उदगीरलामराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा २४ आॅगस्ट रोजी उदगीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. परिषदेच्या रविवारच्या कार्यकारिणीच्या बैठकीत रामचंद्र तिरुके यांनी ठाले यांचा सत्कार केला. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, प्रा. किरण सगर, डॉ. दादा गोरे, डॉ. भास्कर बढे, के. एस. अतकरे, देवीदास कुलकर्णी, डॉ. आसाराम लोमटे, देवीदास फुलारी, प्रा. सुरेश सावंत, दगडू लोमटे, रसिका देशमुख, संजीवनी तडेगावकर, डॉ.ऋषिकेश कांबळे, डॉ.रामचंद्र काळुंखे, विलास सिंदगीकर, संतोष तांबे आदी उपस्थित होते.