शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

जिल्ह्यात २० दिवसात तिसऱ्यांदा यमराज थबकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतील कोरोना परिस्थितीही आटोक्यात येत असून, गेल्या २० दिवसात मंगळवारी तिसऱ्यांदा यमराज थबकला आणि जिल्ह्यात गेल्या २४ ...

औरंगाबाद : औरंगाबादेतील कोरोना परिस्थितीही आटोक्यात येत असून, गेल्या २० दिवसात मंगळवारी तिसऱ्यांदा यमराज थबकला आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर, दिवसभरात शहरात ६ आणि ग्रामीण भागात ९, अशा १५ कोरोना रुग्णांची वाढ झाली.

जिल्ह्यात २३ फेब्रुवारी २०२१ रोजी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, त्यानंतरचा दुसऱ्या लाटेतील प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. तब्बल १५६ दिवसांनंतर २९ जुलै रोजी कोरोनाच्या मृत्यूचक्राला ब्रेक लागला होता. त्यापाठोपाठ ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्याने पुन्हा कोरोना मृत्यूवर विजय मिळविला. आता १० दिवसांनंतर जिल्ह्याने पुन्हा एकदा कोरोना मृत्यूवर मात केली.

जिल्ह्यात सध्या १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ७८३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १७ अशा २५ रुग्णांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद विमानतळ १, देवानगरी परिसर १, बीड बायपास परिसर १, अन्य ३

ग्रामीण भागातील रुग्ण

फुलंब्री १, गंगापूर ३, पैठण ५