शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून चुकीचे रिडिंग; दीड हजार ग्राहकांच्या बिलांची केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:03 IST

निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

औरंगाबाद : कधी वीज ग्राहकांकडून पैसे घेऊन, तर कधी निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने उपविभागस्तरावर वीज बिल दुरुस्तीची मोहीम हाती घेतली असून, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत आतापर्यंत १ हजार ५२६ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. 

महावितरण कंपनीकडून वीज बिल रीडिंगसाठी खाजगी संस्था (एजन्सी) नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. मीटर रीडिंग एजन्सीच्या चुकांमुळे अनेकदा काही ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज बिलासंबंधीच्या तक्रारी महावितरण उपविभागस्तरावर प्राप्त होत आहेत. नियमानुसार या तक्रारी सहा महिन्यांच्या आत उपविभागस्तरावर निपटारा झाला पाहिजे. परंतु तिथे तक्रारींचा निपटारा होत नसल्यामुळे महावितरण प्रादेशिक कार्यालयाकडे आॅनलाईनद्वारे यासंबंधीच्या तक्रारी केल्या जात आहेत. आतापर्यंत महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ११ जिल्ह्यांतील १५१ उपविभागांतून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्थळ निरीक्षण अहवाल, मीटर बदली अहवाल, मीटर परीक्षण अहवाल, ग्राहकांच्या स्थितीचा अहवाल आदी कागदपत्रे ई-मेलद्वारे प्रादेशिक कार्यालयामार्फ त मागविण्यात आली. त्यानंतर सदर प्रकरणे लेखा विभाग, तांत्रिक विभाग, अधीक्षक अभियंता यांच्याकडून शहानिशा केल्यानंतर आॅनलाईन प्रणालीद्वारे ती निकाली काढण्यात आली.एजन्सीकडून घेण्यात आलेल्या रीडिंगबाबत वीज बिलांच्या तक्रारी कमी करण्यासाठी महावितरणकडून मीटर रीडिंगची फेरपडताळणी करण्यात येत आहे. प्रादेशिक कार्यालयाकडे आॅनलाईन २ हजार ७९६ वीज बिलांच्या तक्रारी प्राप्त असून, तक्रारी सोडविण्याठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित ई-मेलद्वारे मागविण्यात आलेली आहेत.

आतापर्यंत १ हजार ५२६ तक्रारींचा निपटारायासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले की, यापूर्वी औरंगाबाद परिमंडळातून ३८५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३५४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. जळगाव परिमंडळातून ४६४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४०७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. लातूर परिमंडळात प्राप्त ७६१ तक्रारींपैकी ६६७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. नांदेड परिमंडळातून १३३ तक्रारींपैकी ९८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. आजपर्यंत अशा एकूण १ हजार ७४३ प्राप्त तक्रारींपैकी १ हजार ५२६ वीज बिलांच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबाद