शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महावितरणकडून चुकीचे रिडिंग; दीड हजार ग्राहकांच्या बिलांची केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:03 IST

निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

औरंगाबाद : कधी वीज ग्राहकांकडून पैसे घेऊन, तर कधी निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने उपविभागस्तरावर वीज बिल दुरुस्तीची मोहीम हाती घेतली असून, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत आतापर्यंत १ हजार ५२६ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. 

महावितरण कंपनीकडून वीज बिल रीडिंगसाठी खाजगी संस्था (एजन्सी) नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. मीटर रीडिंग एजन्सीच्या चुकांमुळे अनेकदा काही ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज बिलासंबंधीच्या तक्रारी महावितरण उपविभागस्तरावर प्राप्त होत आहेत. नियमानुसार या तक्रारी सहा महिन्यांच्या आत उपविभागस्तरावर निपटारा झाला पाहिजे. परंतु तिथे तक्रारींचा निपटारा होत नसल्यामुळे महावितरण प्रादेशिक कार्यालयाकडे आॅनलाईनद्वारे यासंबंधीच्या तक्रारी केल्या जात आहेत. आतापर्यंत महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ११ जिल्ह्यांतील १५१ उपविभागांतून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्थळ निरीक्षण अहवाल, मीटर बदली अहवाल, मीटर परीक्षण अहवाल, ग्राहकांच्या स्थितीचा अहवाल आदी कागदपत्रे ई-मेलद्वारे प्रादेशिक कार्यालयामार्फ त मागविण्यात आली. त्यानंतर सदर प्रकरणे लेखा विभाग, तांत्रिक विभाग, अधीक्षक अभियंता यांच्याकडून शहानिशा केल्यानंतर आॅनलाईन प्रणालीद्वारे ती निकाली काढण्यात आली.एजन्सीकडून घेण्यात आलेल्या रीडिंगबाबत वीज बिलांच्या तक्रारी कमी करण्यासाठी महावितरणकडून मीटर रीडिंगची फेरपडताळणी करण्यात येत आहे. प्रादेशिक कार्यालयाकडे आॅनलाईन २ हजार ७९६ वीज बिलांच्या तक्रारी प्राप्त असून, तक्रारी सोडविण्याठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित ई-मेलद्वारे मागविण्यात आलेली आहेत.

आतापर्यंत १ हजार ५२६ तक्रारींचा निपटारायासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले की, यापूर्वी औरंगाबाद परिमंडळातून ३८५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३५४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. जळगाव परिमंडळातून ४६४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४०७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. लातूर परिमंडळात प्राप्त ७६१ तक्रारींपैकी ६६७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. नांदेड परिमंडळातून १३३ तक्रारींपैकी ९८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. आजपर्यंत अशा एकूण १ हजार ७४३ प्राप्त तक्रारींपैकी १ हजार ५२६ वीज बिलांच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबाद