शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

वादळाच्या तडाख्याने संसार उघड्यावर

By admin | Updated: June 11, 2014 00:26 IST

दिनेश गुळवे , बीड सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गेवराई, बीड तालुक्यातील काही गावांना जोरदार तडाखा दिला.

दिनेश गुळवे , बीडसोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गेवराई, बीड तालुक्यातील काही गावांना जोरदार तडाखा दिला. वादळामध्ये अनेकांची पक्की घरे पडली, दोनशे गंजी उडाल्या, चारशेवर झाडे उन्मळून पडली, तर कित्येकांच्या घरावरील, शेडवरील पत्रे उडाले. या नैसर्गिक आपत्तीने एकच हाहाकार उडाला. यात अनेकांना जखमा झाल्या, तर केतुरा परिसरात एक बैलही ठार झाला आहे. सोमवारी दुपारपर्यंत तीव्र ऊन पडले होते. सायंकाळी ६ च्या सुमारास आभाळ आले. यावेळी वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. कधी नव्हे तो असे वादळ गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी, बाबर वस्ती तर बीड तालुक्यातील केतुरा, बहाद्दरपूर, पारगाव, सोनगाव या परिसरात आले. या वादळात शेतात असलेल्या मजुरांची एकच तारांबळ उडाली. अनेकांना पावसाने झोडपून काढले. शिरसमार्ग येथील आसाराम रडे, उत्तम रडे व दत्ता रडे यांनी शेतात कोंबड्या पाळल्या होत्या. वादळ व पावसाने तब्बल दीडशे कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. तसेच यावेळी पंडित रडे व उत्तम रडे यांचे पत्र्याचे शेड पडले. यामुळे नुकसान तर झालेच शिवाय गणेश रडे व उत्तम रडे यांना गंभीर मार लागला. तसेच येथील आसाराम रडे, दत्ता रडे व गणेश रडे यांच्या मोसंबी बागाचेही नुकसान झाले. येथून जवळच बाबर वस्ती आहे. येथील कल्याण बाबर, रामदास बाबर व रामनाथ बाबर यांचे पक्के घर पडले. घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले, शिवाय संसारोपयोगी वस्तूंवर घरावरील दगड पडल्याने त्याही फुटल्या गेल्या. या परिसरातील दिमाखवाडी येथेलही अनेक शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी उडाल्या आहेत. तर, आंब्याचे झाडांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड तालुक्यातील पारगाव येथेही शेतकऱ्यांची वादळी वाऱ्याने व पावसाने मोठी वाताहत झाली आहे. गेवराई तालुक्यातील तरटेवाडी येथेही अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील विठ्ठल कारंडे व नारायण कारंडे यांचे पक्के घर पडले आहे. वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले, शिवाय घराच्या वरांड्याही पडल्या आहेत. यामुळे घरातील धान्यही भिजले आहे. येथील अनेक झाडे पडली आहेत. काही झाडे विद्युत तारांवर पडल्याने येथील वीजपुरवठा रात्रीपासून खंडित आहे. येथील भागुबाई मार्कड यांचेही शेड पडले तर लक्ष्मण सजगणे, हरी काळे, मधुकर गवते, यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घराची पडझड झाली. कित्येक जखमी झाले. यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. या परिसरातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी उडाल्या आहेत, आंबा, चिंच, लिंब, बाभूळ अशी चारशेपेक्षा अधिक झाडे पडली आहेत, दहापेक्षा अधिक शेतकरी जखमी आहेत. तर पक्के घर, पत्र्याचे शेड व जनावरांचे गोठेही मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहेत. बीड तालुक्यातील केतुरा, अवलपूर, पारगाव, सोनगाव येथेही मोठे नुकसान झाले आहे. केतुरा येथील भागवत कुडके यांचा बैल पावसात झोडपल्याने दगावला आहे. तर, पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने उमाकांत जगताप, ऋषिकेश जगताप हे जखमी झाले आहेत. या परिसरात अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटले आहेत, झाडे उन्मळून पडली, गंज्या उडाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात सोमवारी सायंकाळी बंद झालेला वीजपुरवठा मंगळवारीही बंद होता. नुकसानीचे पंचनामे करूशिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी, बाबर वस्ती या परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावीशिरसमार्गसह परिसरात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी रायगड संघटनेचे रामेश्वर लंबे, प्रा. आसाराम पवळ, रोहित लंबे, नारायण ढगे, द्वारकादास पाबळे, पांडुरंग कारंडे, माऊली पंडित, सोमेश्वर लंबे, महादेव कारंडे, पप्पू पवळ, सुनील धस आदींनी केली आहे. बैलगाडीसह संसारोपयोगी वस्तू उडाल्याशिरसमार्ग येथील शेतकरी मनोज रडे यांची बैलगाडी शेतामध्ये उभी होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वारे आल्याने ही बैलगाडी तब्बल शंभर फूट दूर फरफटत गेली. तसेच, यावेळी घरावरील पत्रे, कपडे, पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या यासह विविध वस्तू वाऱ्याने उडून दूर गेल्या. प्रशासनाने घेतली दखलशिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी व बाबर वस्ती येथील झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाला मिळताच दखल घेतली. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठविण्यासाठी तलाठी तांबे यांना सूचना दिल्या. यानंतर लगेच त्यांनी पाहणी केली. अंगावर पत्रे पडल्याने वृद्धेचा तुटला हातसोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूरकासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील गंगुबाई भानुदास सानप यांचे घरही पडले. घरावरील काही पत्रे वाऱ्याने उडाले तर काही पत्रे घरातच पडले. यावेळी घरामध्ये गंगुबाई सानप (वय-७०) या बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या हातावर घरावरील पत्रा पडल्याने त्यांचा हात कोपरापासून वेगळा झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. आपद्ग्रस्तांना मदत करूबीड व गेवराई तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थ, शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.