शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

कामगारांनो तुमच्या पाल्याला शिष्यवृत्ती मिळते का? काय आहे पात्रता ? वेळ काढा, जाणून घ्या

By साहेबराव हिवराळे | Updated: December 4, 2023 14:03 IST

पगारात कामगार कल्याण निधी कपात झाला काय?

वाळूज महानगर : माहे जृून व डिसेंबरच्या पगारातून रु. १२ इतका कामगार कल्याण निधी कपात होणाऱ्या कामगारांच्या कुटुंबातील मुलांना शैक्षणिक पात्रता शिष्यवृत्ती योजना लाभार्थी होता येते. हे तुम्हाला माहीत होते का? नसेल तर करा अर्ज व फायदा घ्याच.

कोण आहे याला पात्र..?आपण नोकरी करता का? मग हे तुमच्यासाठी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाने कल्याणकारी उपक्रम सुरू केलेला आहे; परंतु. ९० टक्के कामगाराला या कल्याणकारी योजनेचा लाभ घेता आलेला नाही. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची माहिती विशेषत: प्रशासनाने संस्थेने कामगाराला दिली पाहिजे. याविषयी कामगार संघटना फक्त कामगारांच्या पगारवाढ व अग्रिमेंट या दोन प्रकरणांमध्ये झगडत असतात. शासनाच्या उपक्रमाची माहिती दिली जात नाही.

हे घेऊ शकता लाभ...साखर कारखाना, खासगी कंपनी, सूतगिरणी, लहान-मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस. टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बीएसएनएल, माथाडी कामगार, सिक्युरिटी एजन्सी, एमटीएनएल, दूध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषी उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा फॅक्टरी ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, बॉम्बे शाॅप ॲक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट ॲक्ट अंतर्गत नोंदीत आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही योजना दरवर्षी चालवते.

याकडे लक्ष द्यावे-फक्त कामगारांच्या पाल्यांसाठी (मुले व पत्नी) योजना आहे.-अर्ज करण्यास मागील वर्षीच्या परीक्षेत कमीतकमी ६०% आवश्यक आहेत.- ९ पास अर्थात १० वी पासपासून ते पुढील सर्व शिक्षणाकरिता अर्ज करता येईल.(प्रत्येक वर्षी अर्ज करता येतो.)-फक्त शासनमान्य अभ्यासक्रम व शासनमान्य संस्थेला प्रवेश घेतलेल्यांनीच अर्ज करावा.-मुक्त विद्यापीठ, बहिस्थ अभ्यासक्रम, दूरस्थ शिक्षण, अप्रेंटिशिप, स्टायपेंड घेणाऱ्यांनी अर्ज करू नये.- अर्ज भरताना मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत, झेराॅक्स कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज बाद केला जाईल.-अर्ज भरताना एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तपशील टाकायलाच हवा. ज्यांना ग्रेड, ग्रेड पाॅइंट किंवा इतर प्रकारे गुण दिले असतील तर त्यांनी काॅलेजकडून गुणांची टक्केवारी व गुण आणि स्वत:च्या नावाच्या तपशिलासह पत्र प्राप्त करून ते पत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.

कामातून थोडा वेळ पाल्यासाठी काढा अत्यंत महत्त्वाचे जाणून घ्या-दिव्यांगांना ६०% गुणांची अट असणार नाही. तो विद्यार्थी फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.- सदर शिष्यवृत्ती मंडळाची तरतूद व मेरिट या निकषावर दिली जाणार आहे.(फक्त उत्तीर्ण निकाल चालेल. एटी-केटी चालणार नाही.)- अपूर्ण माहितीचा आणि चुकीची माहितीचा अर्ज ऑनलाइन भरल्यास अर्ज बाद केला जाईल, याची जबाबदारी कामगार व त्यांच्या पाल्याची आहे. ऑनलाइन विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागेल.

शिष्यवृत्ती रक्कम माहिती खालीलप्रमाणे--दहावी ते बारावी.- रु. २,०००/--पदवी- रु. २,५००/--पदव्युत्तर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- रु. ३,०००/-- व्यावसायिक पदविका (डिप्लोमा)- रु. २,५००/--व्यावसायिक पदवी- रु. ५,०००/--पीएच.डी. नोंदणी- रु. ५,०००/--एमपीएससी प्रीलिम्स उत्तीर्ण- रु. ५,०००/-- यूपीएससी प्रेलिमिनेटरी उत्तीर्ण- रु. ८,०००/--परदेशात शिकत असेल, तर रु. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र ऑनलाइन अर्ज भरावा.)

कामगार बांधवांनो पाल्याकडे लक्ष द्या...-३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे, नियमात बसणाऱ्या कामगारांनी ऑनलाइन अर्ज आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी भरून त्यांच्या शैक्षणिक कार्यात आपला हातभार लावावा. यासाठी जिल्हा, विभाग, औद्योगिक सेक्टरनुसार विभागाचे सहा. कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सुरू आहे.-विजय अहिरे, कल्याण निरीक्षक, कामगार कल्याण भवन, बजाजनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLabourकामगार