शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाळूज एमआयडीसीत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 19:13 IST

वाळूज एमआयडीसीत खाजगी कंपनीच्या मदतीने कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे.

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत खाजगी कंपनीच्या मदतीने कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या प्रकल्पासाठी जवळपास १७ कोटींचा निधी खर्च होणार असून, आजघडीला या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्चअखेर हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाळूज उद्योगनगरी, बजाजनगरसह भागातील ग्रामपंचायत हद्दीत जमा होणाºया कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी उद्योजक संघटना व स्थानिक ग्रामपंचायतींकडून एमआयडीसी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. कचºयाचा गंभीर बनलेला प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून वर्षभरापूर्वी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार करण्यात आला आहे.

नऊ महिन्यांपूर्वी याचे भूमिपूजन करण्यात आले होते. या प्रकल्पात संबधित कंपनीकडून परिसरातील ओला व सुका कचरा गोळा करुन या कचºयावर प्रकिया करुन बायोगॅस व सेंद्रिय खताची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी १६ कोटी ७० लाख रुपये खर्च होणार असून, एमआयडीसी प्रशासनाकडून प्रकल्पासाठी ३ हेक्टर १८ गुंठे जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उद्योगनगरीत मायलॉन कंपनीसमोर भूखंड क्रमांक पी.-१८३ या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रकल्पात कचºयावर प्रक्रिया करुन सेंद्रिय खत व सीएनजीची गॅस निर्मिती केली जाणार आहे. संबधित कंपनीकडून औद्योगिक परिसर व नागरी वसाहतीत ठिक-ठिकाणी गोळा होणारा कचरा वाहनांद्वारे संकलित केला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक उद्योजक व नागरिकांकडून कुठलेही मोफत कचरा संकलन केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रात तसेच नागरी वसाहती स्वच्छ होण्यास मदत मिळणार आहे.

प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्णवाळूज एमआयडीसीतीत महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पात उद्योगनरीतील १५ मेट्रिक टन व नागरी वसाहतीतील १६ मेट्रिक टन अशा ३१ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, उपअभियंता सुधीर सुत्रावे यांनी दिली.

कचरा वर्गीकरणासाठी जनजागृतीपरिसरातील उद्योजक, व्यवसायिक व नागरिकांत ओला व सुका कचरा वेग-वेगळा कसा ठेवावा, यासाठी परिसरातील कंपन्या, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आदी ठिकाणी एमआयडीसीकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :WalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसी