शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीन प्रमुख महामार्गांची कामे अंतीम टप्प्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:10 IST

विजय सरवदे औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गांची युद्धपातळीवर सुरु ...

विजय सरवदे

औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गांची युद्धपातळीवर सुरु असून या तीनही महामार्गांवरुन या वर्षाखेरपर्यंत वाहतूक सुरू करण्याचा संबंधित प्राधिकारणांचा प्रयत्न आहे.

नव्वदच्या दशकात आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख होती. मात्र, दळणवळणाच्या पायाभूत सुविधांअभावी इथे गुंतवणूक करण्यास बहुराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योग उत्सुक नव्हते. त्यातच आता औरंगाबादेत ‘डीएमआयसी’ सारखी आंतराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उदयास येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने विविध राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची कामे हाती घेतली.

यामध्ये सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या (क्रमांक २११) चौपदरीकरणाचे काम आठ वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात सोलापूर ते येडशीपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर वर्षभरापासून येडशी ते औरंगाबाद या महामार्गावर वाहतूक सुरु झाली. या महामार्गावरील वाहतूक औरंगाबाद शहराबाहेरुन वळविण्यासाठी नवीन बाह्यवळण (बायपास) रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. निपाणीपासून सुरु झालेला हा बाह्यवळण रस्ता पुढे सातारा डोंगराच्या अलीकडून वाल्मी, पैठण लिंकरोड (वाळूजकडे जाणारा), करोडी, माळीवाडा, कसाबखेडा मार्गे कन्नड असा गेला आहे. सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून १ मेपासून या रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. सोलापूर- धुळे हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून ८९.५६ किलोमीटर लांबीचा जात आहे.

समृद्धी महामार्ग हा जालना व औरंगाबाद जिल्ह्यातून जात असून जालना जिल्ह्यातून ४२, तर औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या रस्त्याचे कामही गतीने सुरू असून नियोजित वेळेत हा टप्पा पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा प्रयत्न आहे. तथापि, या रस्त्यावरुन नागपूर ते शिर्डी मार्गे औरंगाबाद अशी वाहतूक १ मे रोजी सुरु करण्यात येणार आहे. हा महामार्ग उद्योग, व्यापार, शेती क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

चौकट...

औरंगाबाद- जळगाव महामार्गात भूसंपादनाचे अडथळे

औरंगाबाद- जळगाव मार्गे सिल्लोड राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३ एफ) १४७ किलोमिटर लांबीचा चारपदरी रस्ता असून आतापर्यंत ९० किलोमिटर लांबीचा रस्ता तयार झाला आहे. या चार पदरी काँक्रीट रस्ता व पुलांची कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे; परंतु सध्या काही ठिकाणी खासगी, तर काही ठिकाणी वनविभागाच्या जमीन संपादनात अडथळे येत आहेत. चौका घाटात वनविभागाने जमीन न दिल्यामुळे तिथे चारपदरी रस्ता करणे शक्य झाले नाही. तरिही अडथळ्याची शर्यत पार करत रस्त्याचे काम केले जात आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी सांगितले.

चौकट.....

(ग्राफिक्ससाठी पॉईंटर)

औरंगाबाद जिल्ह्यातून किती कि.मी. लांबीचे रस्ते जात आहेत

- सोलापूर- धुळे हा महामार्ग ८९.५६ किलोमीटर लांब

- समृद्धी महामार्ग हा महामार्ग ११२ किलोमीटर लांब

- औरंगाबाद- जळगाव हा महामार्ग ११० किलोमिटर लांब

चौकट......

(ग्राफिक्ससाठी पॉईंटर)

वाहतुकीसाठी महामार्गाची निर्धारित तारीख

- सोलापूर- धुळे महार्गावरील नवीन बायपास १ मेपासून

- समृद्धी महामार्ग १ मेपासून

- औरंगाबाद- जळगाव महामार्ग ३१ ऑक्टोबरपासून