शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

तीन प्रमुख महामार्गांची कामे अंतीम टप्प्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:10 IST

विजय सरवदे औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गांची युद्धपातळीवर सुरु ...

विजय सरवदे

औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गांची युद्धपातळीवर सुरु असून या तीनही महामार्गांवरुन या वर्षाखेरपर्यंत वाहतूक सुरू करण्याचा संबंधित प्राधिकारणांचा प्रयत्न आहे.

नव्वदच्या दशकात आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख होती. मात्र, दळणवळणाच्या पायाभूत सुविधांअभावी इथे गुंतवणूक करण्यास बहुराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योग उत्सुक नव्हते. त्यातच आता औरंगाबादेत ‘डीएमआयसी’ सारखी आंतराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उदयास येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने विविध राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची कामे हाती घेतली.

यामध्ये सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या (क्रमांक २११) चौपदरीकरणाचे काम आठ वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात सोलापूर ते येडशीपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर वर्षभरापासून येडशी ते औरंगाबाद या महामार्गावर वाहतूक सुरु झाली. या महामार्गावरील वाहतूक औरंगाबाद शहराबाहेरुन वळविण्यासाठी नवीन बाह्यवळण (बायपास) रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. निपाणीपासून सुरु झालेला हा बाह्यवळण रस्ता पुढे सातारा डोंगराच्या अलीकडून वाल्मी, पैठण लिंकरोड (वाळूजकडे जाणारा), करोडी, माळीवाडा, कसाबखेडा मार्गे कन्नड असा गेला आहे. सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून १ मेपासून या रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. सोलापूर- धुळे हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून ८९.५६ किलोमीटर लांबीचा जात आहे.

समृद्धी महामार्ग हा जालना व औरंगाबाद जिल्ह्यातून जात असून जालना जिल्ह्यातून ४२, तर औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या रस्त्याचे कामही गतीने सुरू असून नियोजित वेळेत हा टप्पा पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा प्रयत्न आहे. तथापि, या रस्त्यावरुन नागपूर ते शिर्डी मार्गे औरंगाबाद अशी वाहतूक १ मे रोजी सुरु करण्यात येणार आहे. हा महामार्ग उद्योग, व्यापार, शेती क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

चौकट...

औरंगाबाद- जळगाव महामार्गात भूसंपादनाचे अडथळे

औरंगाबाद- जळगाव मार्गे सिल्लोड राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३ एफ) १४७ किलोमिटर लांबीचा चारपदरी रस्ता असून आतापर्यंत ९० किलोमिटर लांबीचा रस्ता तयार झाला आहे. या चार पदरी काँक्रीट रस्ता व पुलांची कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे; परंतु सध्या काही ठिकाणी खासगी, तर काही ठिकाणी वनविभागाच्या जमीन संपादनात अडथळे येत आहेत. चौका घाटात वनविभागाने जमीन न दिल्यामुळे तिथे चारपदरी रस्ता करणे शक्य झाले नाही. तरिही अडथळ्याची शर्यत पार करत रस्त्याचे काम केले जात आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी सांगितले.

चौकट.....

(ग्राफिक्ससाठी पॉईंटर)

औरंगाबाद जिल्ह्यातून किती कि.मी. लांबीचे रस्ते जात आहेत

- सोलापूर- धुळे हा महामार्ग ८९.५६ किलोमीटर लांब

- समृद्धी महामार्ग हा महामार्ग ११२ किलोमीटर लांब

- औरंगाबाद- जळगाव हा महामार्ग ११० किलोमिटर लांब

चौकट......

(ग्राफिक्ससाठी पॉईंटर)

वाहतुकीसाठी महामार्गाची निर्धारित तारीख

- सोलापूर- धुळे महार्गावरील नवीन बायपास १ मेपासून

- समृद्धी महामार्ग १ मेपासून

- औरंगाबाद- जळगाव महामार्ग ३१ ऑक्टोबरपासून