शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब

By admin | Updated: July 22, 2014 00:36 IST

वाळूज महानगर : वाळूज- कमळापूर रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार तीन महिन्यांपासून गायब झाल्यामुळे डांबरीकरणाचे काम बंद पडले आहे.

वाळूज महानगर : वाळूज- कमळापूर रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार तीन महिन्यांपासून गायब झाल्यामुळे डांबरीकरणाचे काम बंद पडले आहे. काम अर्धवट सोडल्यामुळे या रस्त्यासाठी मंजूर झालेले ८७ लाख रुपयांचे काय होणार, असा प्रश्न आहे.दुरवस्था झालेल्या वाळूज- कमळापूर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ८७ लाख रुपये मंजूर केले होते. गेल्या मार्च महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गंगापूर येथील वाकडे व रमेश शिंदे या ठेकेदारांना देण्यात आले होते. त्यांनी रस्त्यावर खड्डे बुजवून तसेच खडी अंथरूण रस्त्याची दबाई केली आहे. खड्डे व खडी अंथरूण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवत ठेकेदार डांबरीकरण न करताच अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्वपदावर येत आहे. खडीची दबाई व्यवस्थित न झाल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे लहान- मोठे अपघात होत आहेत. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद अग्रवाल, माजी सदस्य चंद्रकांत पवार, रवींद्र सिरसाठ, जोगेश्वरीचे उपसरपंच नजीरखाँ पठाण यांनी केला आहे.कारपेट व सीलकोटसाठी सूचनायाविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जी.बी. पोहेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या रस्त्याच्या कामासाठी जवळपास ४० लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. या रस्त्यावर कारपेट व सीलकोट टाकण्याच्या सूचना या ठेकेदारांना केल्या आहेत. अधिकारी ठेकेदारांची हातमिळवणीवाळूज औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी वाळूज व शेंदुरवादा परिसरातील कामगार व नागरिकांसाठी हा जवळचा रस्ता आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाले; पण ते अर्धवट सोडून ठेकेदार पसार झाल्यामुळे रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत आहे. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले असून त्वरित पुन्हा काम करावे.-शिवप्रसाद अग्रवाल, ग्रा.पं. सदस्य, वाळूजरस्त्याची ‘जैसे थे’ अवस्थाचार महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, गुणवत्तापूर्ण काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडत चालले आहेत. या रस्त्याची ‘जैसे थे’ अवस्था झाली असून ठेकेदार व अधिकारी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलन करील.- दीपक बडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस गंगापूर तालुका