शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पाणंद रस्त्याचे काम रखडले; शेतकऱ्यांत संताप

By admin | Updated: June 24, 2014 00:11 IST

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावच्या पाणंद रस्त्यांना सन २०११ पासून प्रशासकीय मान्यता मिळून सुध्दा ते लाल फितीत अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावच्या पाणंद रस्त्यांना सन २०११ पासून प्रशासकीय मान्यता मिळून सुध्दा ते लाल फितीत अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.सन २०११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व हे रस्ते गावांना जोडण्यासाठी पाणंद रस्त्यांची योजना राबवून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. या योजनेमध्ये अनेक गावातील रस्ते हे रोहयोमधून करण्याचे ठरले होते. बऱ्याच रस्त्यांच्या कामाला गावोगाव सुरुवात सुध्दा करण्यात आली होती. परंतु मध्येच हे सर्व रस्ते अर्धवट स्थितीत पडून आहेत. आता हे रस्ते लोकवर्गणीतून तयार करा, असा सल्ला शासनाने दिल्याने व लोकवर्गणी भरण्यास कोणीच पुढे येत नसल्याने हे सर्व रस्ते शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु करावे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अक्षरश: चिखल तुडवत तारेवरची कसरत करावी लागते. या पाणंद रस्त्यांना तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन अर्धवट स्थितीत रखडलेले खडीकरणाचे कामांना मान्यता द्यावी, अशी मागणी सरपंच रघुनाथ कदम, विठ्ठल सवडे, दिगंबर सवडे, अवचितराव सवडे, श्रीराम उगले, शिवाजीराव बनकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)काम पूर्ण करण्याची मागणीसन २०११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व हे रस्ते गावांना जोडण्यासाठी पाणंद रस्त्यांची योजना राबवून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.