शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

परभणी रेल्वेस्थानकावरील कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:58 IST

येथील रेल्वेस्थानकावर अनेक असुविधा झाल्या असून, वेळोवेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे़ मात्र विकास कामे सुरू होत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे परभणीत प्रवाशांची हेळसांड होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावर अनेक असुविधा झाल्या असून, वेळोवेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे़ मात्र विकास कामे सुरू होत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे परभणीत प्रवाशांची हेळसांड होत आहे़परभणी रेल्वेस्थानक हे नांदेड विभागातील मोठे रेल्वेस्थानक असून, या ठिकाणाहून दररोज सुमारे १५ हजार प्रवासी प्रवास करतात़ मागील सहा महिन्यांपासून रेल्वे स्थानकावरील असुविधांमध्ये भर पडली आहे़ रेल्वे प्रशासनाच्या आदर्श रेल्वे स्थानकात समावेश असलेल्या परभणी येथील विकास कामे ठप्प असून, ही कामे सुरु होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे़परभणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ परभणी ते मिरखेलपर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर या समस्यांमध्ये भर पडली़ दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर औरंगाबाद, मुंबईकडे जाणाºया सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबविल्या जात आहेत़ मात्र या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत़विशेष म्हणजे, परभणीहून औरंगाबाद, मनमाड, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि याच प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागतो़ पिण्याच्या पाण्याची सुविधा या ठिकणी उपलब्ध नाही़ तसेच स्वच्छतागृह, बसण्यासाठी आसन व्यवस्था या मुलभूत सुविधाही उपलब्ध नसून प्लॅटफॉर्मवर पोझीशन बोर्ड लावलेले नाहीत़ त्यामुळे आरक्षित डबा नेमका कुठे येणार? असा प्रश्न प्रवाशांना पडतो़ आरक्षण केल्यानंतर प्रवाशांना त्यांचा कोच क्रमांक व सीट क्रमांक मिळतो़ हा क्रमांक माहीत असतानाही रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांना धावपळ करीत जागा पकडावी लागते़ रेल्वे प्रशासनाने या ठिकणी किमान पोझीशन बोर्ड बसवून प्रवाशांची असुविधा दूर करावी, अशी प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़पादचारी पुलाचा प्रश्नही प्रलंबित आहे़ रेल्वे मार्ग दुहेरीकरणानंतर पादचारी पुलाचा वापर वाढला आहे़ महिनाभरापूर्वी मुंबई येथे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होवून २२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला होता़परभणीतील पादचारी पूलही अरुंद आहे़ या ठिकाणी मोठा पादचारी पूल उभारण्याची आवश्यकता आहे़ त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांना पादचारी पूल ओलांडून जाताना तारेवरची कसरत करावी लागते़या ठिकाणी लिफ्ट, एक्सलेटर मंजूर असताना ते अद्याप बसविले नाही़ त्याचप्रमाणे इतर अनेक समस्या निर्माण झाल्या असून, त्याकडे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.