शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी रेल्वेस्थानकावरील कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:58 IST

येथील रेल्वेस्थानकावर अनेक असुविधा झाल्या असून, वेळोवेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे़ मात्र विकास कामे सुरू होत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे परभणीत प्रवाशांची हेळसांड होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावर अनेक असुविधा झाल्या असून, वेळोवेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे़ मात्र विकास कामे सुरू होत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे परभणीत प्रवाशांची हेळसांड होत आहे़परभणी रेल्वेस्थानक हे नांदेड विभागातील मोठे रेल्वेस्थानक असून, या ठिकाणाहून दररोज सुमारे १५ हजार प्रवासी प्रवास करतात़ मागील सहा महिन्यांपासून रेल्वे स्थानकावरील असुविधांमध्ये भर पडली आहे़ रेल्वे प्रशासनाच्या आदर्श रेल्वे स्थानकात समावेश असलेल्या परभणी येथील विकास कामे ठप्प असून, ही कामे सुरु होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे़परभणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ परभणी ते मिरखेलपर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर या समस्यांमध्ये भर पडली़ दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर औरंगाबाद, मुंबईकडे जाणाºया सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबविल्या जात आहेत़ मात्र या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत़विशेष म्हणजे, परभणीहून औरंगाबाद, मनमाड, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि याच प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागतो़ पिण्याच्या पाण्याची सुविधा या ठिकणी उपलब्ध नाही़ तसेच स्वच्छतागृह, बसण्यासाठी आसन व्यवस्था या मुलभूत सुविधाही उपलब्ध नसून प्लॅटफॉर्मवर पोझीशन बोर्ड लावलेले नाहीत़ त्यामुळे आरक्षित डबा नेमका कुठे येणार? असा प्रश्न प्रवाशांना पडतो़ आरक्षण केल्यानंतर प्रवाशांना त्यांचा कोच क्रमांक व सीट क्रमांक मिळतो़ हा क्रमांक माहीत असतानाही रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांना धावपळ करीत जागा पकडावी लागते़ रेल्वे प्रशासनाने या ठिकणी किमान पोझीशन बोर्ड बसवून प्रवाशांची असुविधा दूर करावी, अशी प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़पादचारी पुलाचा प्रश्नही प्रलंबित आहे़ रेल्वे मार्ग दुहेरीकरणानंतर पादचारी पुलाचा वापर वाढला आहे़ महिनाभरापूर्वी मुंबई येथे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होवून २२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला होता़परभणीतील पादचारी पूलही अरुंद आहे़ या ठिकाणी मोठा पादचारी पूल उभारण्याची आवश्यकता आहे़ त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांना पादचारी पूल ओलांडून जाताना तारेवरची कसरत करावी लागते़या ठिकाणी लिफ्ट, एक्सलेटर मंजूर असताना ते अद्याप बसविले नाही़ त्याचप्रमाणे इतर अनेक समस्या निर्माण झाल्या असून, त्याकडे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.