शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

इन्फ्रा योजनेची कामे रखडली

By admin | Updated: October 14, 2016 00:14 IST

जालना : महावितरणकडून इन्फ्रा दोन ही योजना रखडली आहे

 इन्फ्रा योजनेची कामे रखडलीजालना : मागेल त्याला जोडणी व योग्य दाबाने वीज मिळावी म्हणून महावितरणकडून इन्फ्रा दोन ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, विभाग एक अंतर्गत बऱ्यापैकी कामे झाली असली तरी विभाग दोन अंतर्गत महावितरण व कंत्राटदार यांच्या वादात ही योजना रखडली आहे. संबंधित कंत्राटदार न्यायालयात गेल्याने ही कामे जैसे थेच आहेत. जिल्ह्यात महावितरणचे ग्राहक वाढत आहेत. दाब वाढत आहे. यामुळे घरगुती, शेतकरी व व्यावसायिकांना वीज मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन महावितरणने तब्बल १५८ कोटी १० लाख रूपये खर्चांची इन्फ्रा दोन ही योजना राबविण्याचे ठरविले. त्यानुसार महावितरणच्या विभाग एक मध्ये ८७ कोटी ८० लाखांची तर दोन अंतर्गत ७० कोटी ३० लाख रूपयांची पायाभूत कामे करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार विभाग दोनमध्ये मंठा, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यात ७०.८० कोटींची कामे सुरू असून, ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अंतर्गत ३३ केव्ही क्षमतेचे चार नवीन उपकेंद्र, ३३२ मीटरची उच्च दाब व ६४७ मीटरची लघु दाब वाहिनी अंथरण्यात आली. ८७८ नवीन रोहित्रांची उभारणी तर ६४७ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. विभाग दोनची बहुतांश कामे काही दिवसांत पूर्ण होतील, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र विभाग एक अंतर्गत जालना ग्रामीण, जाफराबाद, भोकरदन व बदनापूर तालुक्यात ८३.८० कोटी रूपयांची पायाभूत कामे करावयाची आहेत. यात चार नवीन ३३ केव्हीचे उपकेंद्र, ४८२ मीटरची उच्च दाब वाहिनी तर ८१५ मीटरची लघुदाब वाहिनी अंथरण्यात येत आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने यातील बहुतांश कामे सुरूच केलेली नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. यामुळे या विभागातील अनेक गावांत वीजजोडणी मिळण्यास अडचण आहे. शेतकऱ्यांना नवीन जोडणी देण्यासोबतच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. करण्यात येणाऱ्या कामांना ब्रेक लागला आहे. (प्रतिनिधी)