शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

अंबाजोगाई, परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या विकासाच्या कामांना परवानगी नाही : खंडपीठ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:07 IST

जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करण्याच्या निर्णयांना आव्हान

ठळक मुद्देग्रामपंचायतींची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबच्या निर्णयाला आव्हान पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

औरंगाबाद : १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही विकासाच्या कामांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देऊ नये, असा मनाई हुकूम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी सोमवारी (दि. ५ मार्च) दिला. याचिकेवर पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांमधील सत्ताधारी पक्ष (भाजप-शिवसेना) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत करण्याच्या आणि विरोधी पक्ष (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबत १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढलेल्या दोन शासन निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे मनाई हुकूम दिला आहे. वरील दोन परस्परविरोधी शासन निर्णयांना वागबेट ग्रामपंचायतीचे सरपंच अमरनाथ गिते यांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यांनी राज्य शासन, उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ग्रामविकासमंत्र्यांना प्रतिवादी केले आहे. वरील दोन्ही तालुक्यांतील सर्वच ग्रामपंचायतींची विकासाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि अ‍ॅड. प्रवीण एस. दिघे, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील लोखंडे काम पाहत आहेत. 

राज्य शासनाने १५ फेब्रुवारी २०१९ रोजी अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांमधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकासाची कामे मंजूर केली. ग्रामविकास विभागाने त्याच दिवशी (१५ फेब्रुवारी २०१९ रोजी) दोन शासन निर्णय जारी केले. पहिल्या शासन निर्णयानुसार ज्या ग्रामपंचायती विरोधी पक्ष (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) प्रणीत आहेत, त्या  ग्रामपंचायतींची विकासकामे उस्मानाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावीत, असे म्हटले होते. अशा ग्रामपंचायतींची सुमारे साडेनऊ कोटींची ३०० कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. दुसऱ्या शासन निर्णयानुसार सत्ताधारी पक्ष (भाजप-शिवसेना) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींद्वारे करावीत, असे म्हटले होते, अशा ग्रामपंचायतींची सुमारे साडेसोळा कोटींची ५५० कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली, असा आरोप याचिकेत केला आहे. याचिकाकर्त्याने वरील दोन्ही शासन निर्णयांना आव्हान दिले आहे. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायत