शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अंबाजोगाई, परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या विकासाच्या कामांना परवानगी नाही : खंडपीठ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:07 IST

जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करण्याच्या निर्णयांना आव्हान

ठळक मुद्देग्रामपंचायतींची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबच्या निर्णयाला आव्हान पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

औरंगाबाद : १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही विकासाच्या कामांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देऊ नये, असा मनाई हुकूम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी सोमवारी (दि. ५ मार्च) दिला. याचिकेवर पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांमधील सत्ताधारी पक्ष (भाजप-शिवसेना) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत करण्याच्या आणि विरोधी पक्ष (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबत १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढलेल्या दोन शासन निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे मनाई हुकूम दिला आहे. वरील दोन परस्परविरोधी शासन निर्णयांना वागबेट ग्रामपंचायतीचे सरपंच अमरनाथ गिते यांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यांनी राज्य शासन, उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ग्रामविकासमंत्र्यांना प्रतिवादी केले आहे. वरील दोन्ही तालुक्यांतील सर्वच ग्रामपंचायतींची विकासाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि अ‍ॅड. प्रवीण एस. दिघे, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील लोखंडे काम पाहत आहेत. 

राज्य शासनाने १५ फेब्रुवारी २०१९ रोजी अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांमधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकासाची कामे मंजूर केली. ग्रामविकास विभागाने त्याच दिवशी (१५ फेब्रुवारी २०१९ रोजी) दोन शासन निर्णय जारी केले. पहिल्या शासन निर्णयानुसार ज्या ग्रामपंचायती विरोधी पक्ष (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) प्रणीत आहेत, त्या  ग्रामपंचायतींची विकासकामे उस्मानाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावीत, असे म्हटले होते. अशा ग्रामपंचायतींची सुमारे साडेनऊ कोटींची ३०० कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. दुसऱ्या शासन निर्णयानुसार सत्ताधारी पक्ष (भाजप-शिवसेना) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींद्वारे करावीत, असे म्हटले होते, अशा ग्रामपंचायतींची सुमारे साडेसोळा कोटींची ५५० कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली, असा आरोप याचिकेत केला आहे. याचिकाकर्त्याने वरील दोन्ही शासन निर्णयांना आव्हान दिले आहे. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायत