शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नांदेडला ‘समृद्धी’ला जोडण्यासाठी ‘डीपीआर’चे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:05 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला नांदेडपर्यंत जोडण्यास इन्फ्रा कमिटीने मान्यता दिली आहे. डीपीआरचे काम सुरू झाले असून ते पूर्ण झाले ...

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला नांदेडपर्यंत जोडण्यास इन्फ्रा कमिटीने मान्यता दिली आहे. डीपीआरचे काम सुरू झाले असून ते पूर्ण झाले की पुढील निर्णय होईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना सांगितले. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महामार्गावरून शिर्डीपर्यंत ३१ मे २०२१ पर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे काम ग्रीनफिल्डमधून होईल. विद्यमान रस्त्याला नांदेड जोडले जाणार नाही. नव्याने भूसंपादन करावे लागेल. यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. याप्रसंगी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आदी आमदारांची उपस्थिती होती.

पूजा चव्हाण प्रकरणात काय म्हणाले?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. यावर शिंदे म्हणाले, झालेली घटना दुर्दैवी आहे, विषय संवेदनशील आहे. खात्री आणि पुराव्याशिवाय कुणाचेही नाव एखाद्या प्रकरणात जोडणे योग्य नाही. माहिती घेऊनच यावर भाष्य करीन. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यावर शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले आहे. तारेवरची कसरत सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

संभाजी महाराजांच्या नावाबाबत केंद्राला आकस नाही

संभाजीनगर हा मागील अनेक वर्षांपासूनचा मुद्दा असून ती जनभावना आहे. शिवसेनाप्रमुखांची ती भूमिका होती, त्यानुसारच मुख्यमंत्रीही जनभावनेसोबतच आहेत. संभाजीनगर या नावाला विरोधाचे काही कारण नसून तो अस्मितेचा मुद्दा आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण होईल. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. महापालिका निवडणुका आणि नामकरण अशा राजकीय हेतूने निर्णय होणार नाही.

विमानतळ नामकरणासाठीही केंद्राशी पत्रव्यवहार झाला असून तो निर्णय लवकर होईल. विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यास केंद्र शासनाचा काहीही आकस नाही. केंद्राने सहकार्य केले पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.