शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

नांदेडला ‘समृद्धी’ला जोडण्यासाठी ‘डीपीआर’चे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:05 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला नांदेडपर्यंत जोडण्यास इन्फ्रा कमिटीने मान्यता दिली आहे. डीपीआरचे काम सुरू झाले असून ते पूर्ण झाले ...

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला नांदेडपर्यंत जोडण्यास इन्फ्रा कमिटीने मान्यता दिली आहे. डीपीआरचे काम सुरू झाले असून ते पूर्ण झाले की पुढील निर्णय होईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना सांगितले. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महामार्गावरून शिर्डीपर्यंत ३१ मे २०२१ पर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे काम ग्रीनफिल्डमधून होईल. विद्यमान रस्त्याला नांदेड जोडले जाणार नाही. नव्याने भूसंपादन करावे लागेल. यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. याप्रसंगी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आदी आमदारांची उपस्थिती होती.

पूजा चव्हाण प्रकरणात काय म्हणाले?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. यावर शिंदे म्हणाले, झालेली घटना दुर्दैवी आहे, विषय संवेदनशील आहे. खात्री आणि पुराव्याशिवाय कुणाचेही नाव एखाद्या प्रकरणात जोडणे योग्य नाही. माहिती घेऊनच यावर भाष्य करीन. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यावर शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले आहे. तारेवरची कसरत सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

संभाजी महाराजांच्या नावाबाबत केंद्राला आकस नाही

संभाजीनगर हा मागील अनेक वर्षांपासूनचा मुद्दा असून ती जनभावना आहे. शिवसेनाप्रमुखांची ती भूमिका होती, त्यानुसारच मुख्यमंत्रीही जनभावनेसोबतच आहेत. संभाजीनगर या नावाला विरोधाचे काही कारण नसून तो अस्मितेचा मुद्दा आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण होईल. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. महापालिका निवडणुका आणि नामकरण अशा राजकीय हेतूने निर्णय होणार नाही.

विमानतळ नामकरणासाठीही केंद्राशी पत्रव्यवहार झाला असून तो निर्णय लवकर होईल. विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यास केंद्र शासनाचा काहीही आकस नाही. केंद्राने सहकार्य केले पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.