शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

महिला आघाडीला तिकिटे मिळायला हवी होती

By admin | Updated: April 14, 2015 01:06 IST

औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते

औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते, असे मत शिवसेनेच्या आ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या. युती, बंडखोरी, महिला आघाडी आणि आरक्षणामुळे महिलांना मिळालेल्या उमेदवाऱ्या व निवडून आल्यानंतर त्यांच्या कामकाजाची पद्धत यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. महिला आघाडीचा सन्मान ठेवावा, असे पक्षप्रमुख वारंवार सांगतात. यापूर्वीही महिला आघाडीला उमेदवारी दिली; पण साम, दाम, दंड, भेद या नीतीमुळे त्यांचा पराभव झाल्याचा अनुभव आहे. काही ठिकाणी महिला कमी पडतात. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा सन्मान केला जाईल. युती झाली असली तरी बंडखोरी झाली आहे, यावर त्या म्हणाल्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्याचा आदर करायचा असतो. परंतु जे सोबत राहतील ते मावळे, उडतील ते कावळे. युती व्हावी, ही जनतेची इच्छा आहे. स्थानिक नेत्यांच्या कुटुंबात उमेदवाऱ्या गेल्या, याप्रकरणी त्या म्हणाल्या, निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवारी दिली जाते. शिवसेनेत बहुतांश तिकिटे सर्वसामान्यांना मिळतात. घराणेशाहीचा अपवाद असतो. मग युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार केव्हा होणार असे त्या म्हणाल्या. उमेदवारांची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाहतात. स्थानिकांवर विश्वास ठेवूनच ते निर्णय घेतात. विश्वासाला तडा गेला तर त्यांच्याकडे माफी नाही. एमआयएमला शिवसेनेचे पाठबळ असल्याचा आरोप होत आहे, यावर त्या म्हणाल्या, सेनेच्या विरोधात सर्वांची छुपी युती होत आहे. सेना एमआयएमसोबत कशी असेल?