शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

महिला आघाडीला तिकिटे मिळायला हवी होती

By admin | Updated: April 14, 2015 01:06 IST

औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते

औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते, असे मत शिवसेनेच्या आ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या. युती, बंडखोरी, महिला आघाडी आणि आरक्षणामुळे महिलांना मिळालेल्या उमेदवाऱ्या व निवडून आल्यानंतर त्यांच्या कामकाजाची पद्धत यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. महिला आघाडीचा सन्मान ठेवावा, असे पक्षप्रमुख वारंवार सांगतात. यापूर्वीही महिला आघाडीला उमेदवारी दिली; पण साम, दाम, दंड, भेद या नीतीमुळे त्यांचा पराभव झाल्याचा अनुभव आहे. काही ठिकाणी महिला कमी पडतात. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा सन्मान केला जाईल. युती झाली असली तरी बंडखोरी झाली आहे, यावर त्या म्हणाल्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्याचा आदर करायचा असतो. परंतु जे सोबत राहतील ते मावळे, उडतील ते कावळे. युती व्हावी, ही जनतेची इच्छा आहे. स्थानिक नेत्यांच्या कुटुंबात उमेदवाऱ्या गेल्या, याप्रकरणी त्या म्हणाल्या, निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवारी दिली जाते. शिवसेनेत बहुतांश तिकिटे सर्वसामान्यांना मिळतात. घराणेशाहीचा अपवाद असतो. मग युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार केव्हा होणार असे त्या म्हणाल्या. उमेदवारांची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाहतात. स्थानिकांवर विश्वास ठेवूनच ते निर्णय घेतात. विश्वासाला तडा गेला तर त्यांच्याकडे माफी नाही. एमआयएमला शिवसेनेचे पाठबळ असल्याचा आरोप होत आहे, यावर त्या म्हणाल्या, सेनेच्या विरोधात सर्वांची छुपी युती होत आहे. सेना एमआयएमसोबत कशी असेल?