शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

पाण्यासाठी महिला पालिकेवर धडकल्या

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

जालना: अंबड रस्त्यावरील यशोदीप नगरातील संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासह अन्य मुलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर धडक मारली.

जालना: अंबड रस्त्यावरील यशोदीप नगरातील संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासह अन्य मुलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर धडक मारली. अंबड रस्त्यावरील यशोदीपनगरात ८० ते १०० घरे आहेत. दहा वर्षांपासून या भागात नागरिक वास्तव्यास आहेत, परंतु नगरपालिका प्रशासनाने या भागास पिण्याच्या पाण्यासह अन्य कोणत्याही मुलभूत सोयीसुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळेच संतप्त महिलांनी सोमवारी थेट पालिका कार्यालयावर धडक मारली. सीमा खरात, सुनीता निकाळजे, कमल चव्हाण, कस्तुरा इंगोले, स्वाती वाहुळकर, आशा हिवाळे, मनीषा खिल्लारे, योगीता पवार, अनसूया पवार, डॉ. माधवी देशमुख, अर्चना खाडे, श्रद्धा खाकरे, तारामती शिनगारे, मनीषा साबळे, विद्या देशमुख, नीता देशमुख, रेणुका पाचफुले, नीता टोपे, ज्योती खरात, मालती गोफणे, कांचन हिवाळे, त्रिशाला लबडे, सुमंत अहेर, उर्मिला वळेकर, प्रज्ञा मोरे, अरुणा पवार यांच्यासह शेकडो महिलांनी या कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे या भागात अंतर्गत रस्ते नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लागावी म्हणून नाल्या नाहीत. नळ नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात विद्युत खांब उभारण्यात आले, परंतु त्यास जोडणी नाही, दिवेही नाहीत, अंधारातच ये- जा करावी लागते. पावसाळ्यात तर चिखलमय रस्त्यावरुन कसरती कराव्या लागतात, असे या महिलांनी नमूद केले. मुलांसह आबालवृद्धांचा किमान विचार करुन पालिका प्रशासनाने तात्काळ सोयी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी या महिलांनी केली. महिलांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)रुपनगरवासियांचाही ठिय्या अंबड चौफुली भागातील रुप नगर विठ्ठल रुक्मीणी मंदिर परिसरातील संतप्त महिलांनी पालिका कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. सहा वर्षांपासून नळांद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. वसाहतीत नवीन बांधकामे झाली. परंतु आपापल्या सोयीनुसार अनेकांनी कनेकशन करुन घेतले. त्यामुळे ठिक ठिकाणी पाणीपुरवठा बंद किंवा विस्कळीत झाला आहे. या संदर्भात नगरसेवकांसह पालिका प्रशासना वारंवार सांगून सुद्धा दखल घेतली नाही. अशी खंत अरुणा टकले, अंबिका शंकरपेल्ली, छाया पाथरकर, कविता ठोंबरे, पद्मा मस्के, सुनीता पाफळ, कीर्ती मोरे, अंजली पालवे, शोभा पालवे, राधा सोळे, वर्षा जाधव, छाया कुलकर्णी, सुवर्णा कुलकर्णी, कौशल्या भालेकर, सुनंदा अवचार, केशरबाई कदम, राधा कोरडे, जयश्री अनिल परदेशी, रेखा गायकवाड, आशा काळे, अलका पाटील, सुरेखा पाथरकर, संगीता जाधव, भारती डोईफोडे, श्रृती शेळके, वर्षा सोनवणे, साक्षी पाटील सोनम पवार, दिश वाघमारे, सुशीला डिघोळे आदींनी केली.प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी निवेदनाद्वारे महिलांनी मागणी केली.